शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

Atal Bihari Vajpayee : वाजपेयी म्हणत, राजकारणात येणं सर्वात मोठी चूक होती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 04:29 IST

ज्यांना राजकारणात यायचंच नव्हतं त्या अटलजींवर साऱ्या देशाच्या आशा केंद्रित झाल्या. त्यांनी त्यांच्या एका लेखात म्हटलं, ‘राजकारणात येणं ही माझी सर्वात मोठी चूक होती.

ज्यांना राजकारणात यायचंच नव्हतं त्या अटलजींवर साऱ्या देशाच्या आशा केंद्रित झाल्या. त्यांनी त्यांच्या एका लेखात म्हटलं, ‘राजकारणात येणं ही माझी सर्वात मोठी चूक होती. मला खरं तर अध्ययन-अध्यापन करायची इच्छा होती. भूतकाळातून काही घेऊन भविष्याला काही योगदान देण्याची इच्छा होती. मात्र, राजकारणाच्या खडकाळ रस्त्यावर चालताना काही कमावणं तर दूरच, गाठीला होतं, तेही मी घालवून बसलो!’‘मनाची शांती गेली. एक विचित्र पोकळपण सारं जीवन व्यापून राहिलं. ममता व कारुण्य ही मानवी मूल्यंही आता तोंड फिरवायला लागली आहेत. सत्तेचा संघर्ष विरोधी पक्षीयांशीच नाही, तर स्वपक्षीयांशीही व्हायला लागला आहे. पद आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी जोड-तोड, साठ-गाठ करणं आवश्यक झालं आहे. पण हे सगळं झाल्यानंतरही राजकारणाचा मोह सुटत नाही!’‘रोज सकाळी वर्तमानपत्रात स्वतचं नाव वाचल्यावर जी नशा चढते ती उतरायचं नावच घेत नाही. बहुधा यामुळंच संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी स्वयंसेवकांना वृत्तपत्रीय प्रसिद्धी व स्वागत सत्कारांमध्येच न फसण्याचा इशारा दिला होता. पण आजच्या राजनीतीप्रधान काळात जिथं संस्कृती व समाजाचा विकासही शासनाच्या कृपेवर निर्भर झाला आहे, तिथं स्वतच्या जाहिरातीपासून वाचणं कसं शक्य आहे? साप-मुंगुसासारखी स्थिती झाली आहे. पचवताही येत नाही आणि सोडताही येत नाही....’

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीPoliticsराजकारण