शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

वाजपेयींच्या काळात 'त्या' शेवटच्या क्षणी एअर स्टाईकचा निर्णय रद्द झाला अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 11:54 IST

28 जून रोजी दिल्लीत 'ए प्राइम मिनिस्टर टू रिमेंबर' या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकात सुशील कुमार यांनी लिहिलंय की, जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला होता.

नवी दिल्ली - 13 डिसेंबर 2001 मध्ये दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सीमेवर असणाऱ्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्याची योजना बनविली होती. ज्याप्रकारे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानच्या बालकोट भागात एअर स्ट्राईक केला होता अशाचप्रकारे वाजपेयींनी त्यांच्याकाळात एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला होता. हा खुलासा नौदलाचे माजी प्रमुख सुशील कुमार यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात करण्यात आला आहे. 

28 जून रोजी दिल्लीत 'ए प्राइम मिनिस्टर टू रिमेंबर' या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकात सुशील कुमार यांनी लिहिलंय की, जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला होता. त्यानंतर तिन्ही सेनांचे प्रमुख संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिज आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्रा यांच्यासोबत एक बैठक झाली.

Related image

याच दरम्यान भारत-पाक सीमेवर असणाऱ्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखण्यात आली. या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्याच्या योजनेवर चर्चा झाली. ही योजना अंमलात कशी आणली यावर पुस्तकात कोणतंही भाष्य करण्यात आलं नाही मात्र ग्वालियर येथे मिराज 2000 लढाऊ विमानं हल्ल्यासाठी तयार होती. मात्र शेवटच्या क्षणी मिळालेल्या गुप्तचर माहितीनुसार पाकिस्तानच्या सेनेने दहशतवादी तळ एका शाळेमध्ये आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ही योजना शेवटच्या क्षणी गुंडाळली गेली असा खुलासा करण्यात आला आहे. 

त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर भारतीय सीमेवर फौजफाटा तैनात करण्यात आला. या ऑपरेशनला पराक्रम असं नावं दिलं होतं. भारताने जवळपास 10 महिने सीमेवर फौज तैनात केली होती. त्यादिवशी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तिन्ही सेनांच्या प्रमुखांना बैठकीसाठी बोलविलं होतं. वाजपेयींकडून सैन्य दलाच्या सशस्त्र तुकड्यांना सीमेवर आपली ठोस रणनीती आखण्यास सांगितले. तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिज यांच्यासोबत बैठक झाली. सशस्त्र दलाला जानेवारी ते ऑक्टोबर 2002 मध्ये निर्णयाची वाट पाहिली पण तो निर्णय झाला नाही.  

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी