शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

वाजपेयींच्या काळात 'त्या' शेवटच्या क्षणी एअर स्टाईकचा निर्णय रद्द झाला अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 11:54 IST

28 जून रोजी दिल्लीत 'ए प्राइम मिनिस्टर टू रिमेंबर' या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकात सुशील कुमार यांनी लिहिलंय की, जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला होता.

नवी दिल्ली - 13 डिसेंबर 2001 मध्ये दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सीमेवर असणाऱ्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्याची योजना बनविली होती. ज्याप्रकारे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानच्या बालकोट भागात एअर स्ट्राईक केला होता अशाचप्रकारे वाजपेयींनी त्यांच्याकाळात एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला होता. हा खुलासा नौदलाचे माजी प्रमुख सुशील कुमार यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात करण्यात आला आहे. 

28 जून रोजी दिल्लीत 'ए प्राइम मिनिस्टर टू रिमेंबर' या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकात सुशील कुमार यांनी लिहिलंय की, जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला होता. त्यानंतर तिन्ही सेनांचे प्रमुख संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिज आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्रा यांच्यासोबत एक बैठक झाली.

Related image

याच दरम्यान भारत-पाक सीमेवर असणाऱ्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखण्यात आली. या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्याच्या योजनेवर चर्चा झाली. ही योजना अंमलात कशी आणली यावर पुस्तकात कोणतंही भाष्य करण्यात आलं नाही मात्र ग्वालियर येथे मिराज 2000 लढाऊ विमानं हल्ल्यासाठी तयार होती. मात्र शेवटच्या क्षणी मिळालेल्या गुप्तचर माहितीनुसार पाकिस्तानच्या सेनेने दहशतवादी तळ एका शाळेमध्ये आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ही योजना शेवटच्या क्षणी गुंडाळली गेली असा खुलासा करण्यात आला आहे. 

त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर भारतीय सीमेवर फौजफाटा तैनात करण्यात आला. या ऑपरेशनला पराक्रम असं नावं दिलं होतं. भारताने जवळपास 10 महिने सीमेवर फौज तैनात केली होती. त्यादिवशी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तिन्ही सेनांच्या प्रमुखांना बैठकीसाठी बोलविलं होतं. वाजपेयींकडून सैन्य दलाच्या सशस्त्र तुकड्यांना सीमेवर आपली ठोस रणनीती आखण्यास सांगितले. तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिज यांच्यासोबत बैठक झाली. सशस्त्र दलाला जानेवारी ते ऑक्टोबर 2002 मध्ये निर्णयाची वाट पाहिली पण तो निर्णय झाला नाही.  

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी