शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

Atal Bihari Vajpayee :नेहरू म्हणाले होते, हा मुलगा एक दिवस पंतप्रधान होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 05:07 IST

नेहरू खरोखर द्रष्टे होते. त्यांचे भाकीत खरे ठरले. १९९६ मध्ये वाजपेयी पहिल्यांदा १३ दिवसांसाठी पंतप्रधान बनले. नंतर ते १९९८ मध्ये १३ महिन्यांसाठी आणि १९९९ मध्ये पूर्ण पाच वर्षांसाठी पंतप्रधान बनले.

विरोधकांचा सन्मान करण्याचा तो काळ होता. अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना दुर्गेची उपमा दिल्याचे सर्वविदित आहेच; पण त्याही आधी इंदिरा गांधी यांचे पिता आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी वाजपेयी यांच्या बाबतीत ‘हा मुलगा एक दिवस भारताचा पंतप्रधान बनेल’, असे वक्तव्य केले होते.वाजपेयी हे तत्कालीन भारतीय जनसंघाचे (हाच जनसंघ नंतर भाजपात रूपांतरित झाला.) काम करीत होते. जनसंघाला फार अस्तित्व नव्हते. काँग्रेसचा सगळीकडे बोलबाला होता आणि नेहरू काँग्रेसचे निर्विवाद नेते होते. जनसंघाचे नेतृत्व श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडे होते. पत्रकार असलेले वाजपेयी मुखर्जी यांचे राजकीय सचिव बनले. काश्मीरच्या मुद्यावरून जनसंघाने काँग्रेसला तीव्र विरोध चालविला होता. आंदोलन सुरू होते. १0 मे १९५३ रोजी मुखर्जी यांना जम्मू-काश्मीरच्या सीमेवर अटक करून श्रीनगरच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेव्हा मुखर्जी यांनी वाजपेयी यांना आपला दूत म्हणून दिल्लीला पाठविले. दिल्लीत त्यांनी आपले वाक्चातुर्य पणाला लावून मुखर्जी यांची बाजू मांडली. २३ जून १९५३ रोजी मुखर्जी यांचा तुरुंगातच रहस्यमय मृत्यू झाला. तेव्हा वाजपेयी यांच्यावरील जबाबदारी वाढली. तेव्हा त्यांचे वय होते अवघे २८ वर्षे. या तरुण वयातही त्यांनी मुखर्जी यांचा संदेश सरकार आणि जनतेच्या दरबारात अत्यंत प्रभावीपणे मांडली. तरुण वाजपेयी यांनी नेहरूंचेही लक्ष वेधून घेतले.१९५७ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील बलरामपूर मतदारसंघातून विजय मिळवून वाजपेयी लोकसभेत पोहोचले. लोकसभेत त्यांच्या भाषणांनी ज्येष्ठ सदस्यांनाही भुरळ घातली. त्या काळातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची नेतेमंडळीही वाजपेयींच्या भाषणांच्या प्रेमात पडली. नेहरूंचाही त्याला अपवाद नव्हता. एकदा एक विदेशी शिष्टमंडळ भारतभेटीवर आले होते. देशाचे प्रमुख या नात्याने भारतीय नेत्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी स्वत: नेहरूंनी पार पाडली. वाजपेयी यांची शिष्टमंडळाशी ओळख करून देताना नेहरू म्हणाले की, ‘धीस यंग मॅन वन डे विल बिकम द कंट्रीज प्राईम मिनिस्टर...’ (हा तरुण मुलगा एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनेल.)नेहरू खरोखर द्रष्टे होते. त्यांचे भाकीत खरे ठरले. १९९६ मध्ये वाजपेयी पहिल्यांदा १३ दिवसांसाठी पंतप्रधान बनले. नंतर ते १९९८ मध्ये १३ महिन्यांसाठी आणि १९९९ मध्ये पूर्ण पाच वर्षांसाठी पंतप्रधान बनले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधानJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू