शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Atal Bihari Vajpayee :नेहरू म्हणाले होते, हा मुलगा एक दिवस पंतप्रधान होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 05:07 IST

नेहरू खरोखर द्रष्टे होते. त्यांचे भाकीत खरे ठरले. १९९६ मध्ये वाजपेयी पहिल्यांदा १३ दिवसांसाठी पंतप्रधान बनले. नंतर ते १९९८ मध्ये १३ महिन्यांसाठी आणि १९९९ मध्ये पूर्ण पाच वर्षांसाठी पंतप्रधान बनले.

विरोधकांचा सन्मान करण्याचा तो काळ होता. अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना दुर्गेची उपमा दिल्याचे सर्वविदित आहेच; पण त्याही आधी इंदिरा गांधी यांचे पिता आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी वाजपेयी यांच्या बाबतीत ‘हा मुलगा एक दिवस भारताचा पंतप्रधान बनेल’, असे वक्तव्य केले होते.वाजपेयी हे तत्कालीन भारतीय जनसंघाचे (हाच जनसंघ नंतर भाजपात रूपांतरित झाला.) काम करीत होते. जनसंघाला फार अस्तित्व नव्हते. काँग्रेसचा सगळीकडे बोलबाला होता आणि नेहरू काँग्रेसचे निर्विवाद नेते होते. जनसंघाचे नेतृत्व श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडे होते. पत्रकार असलेले वाजपेयी मुखर्जी यांचे राजकीय सचिव बनले. काश्मीरच्या मुद्यावरून जनसंघाने काँग्रेसला तीव्र विरोध चालविला होता. आंदोलन सुरू होते. १0 मे १९५३ रोजी मुखर्जी यांना जम्मू-काश्मीरच्या सीमेवर अटक करून श्रीनगरच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेव्हा मुखर्जी यांनी वाजपेयी यांना आपला दूत म्हणून दिल्लीला पाठविले. दिल्लीत त्यांनी आपले वाक्चातुर्य पणाला लावून मुखर्जी यांची बाजू मांडली. २३ जून १९५३ रोजी मुखर्जी यांचा तुरुंगातच रहस्यमय मृत्यू झाला. तेव्हा वाजपेयी यांच्यावरील जबाबदारी वाढली. तेव्हा त्यांचे वय होते अवघे २८ वर्षे. या तरुण वयातही त्यांनी मुखर्जी यांचा संदेश सरकार आणि जनतेच्या दरबारात अत्यंत प्रभावीपणे मांडली. तरुण वाजपेयी यांनी नेहरूंचेही लक्ष वेधून घेतले.१९५७ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील बलरामपूर मतदारसंघातून विजय मिळवून वाजपेयी लोकसभेत पोहोचले. लोकसभेत त्यांच्या भाषणांनी ज्येष्ठ सदस्यांनाही भुरळ घातली. त्या काळातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची नेतेमंडळीही वाजपेयींच्या भाषणांच्या प्रेमात पडली. नेहरूंचाही त्याला अपवाद नव्हता. एकदा एक विदेशी शिष्टमंडळ भारतभेटीवर आले होते. देशाचे प्रमुख या नात्याने भारतीय नेत्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी स्वत: नेहरूंनी पार पाडली. वाजपेयी यांची शिष्टमंडळाशी ओळख करून देताना नेहरू म्हणाले की, ‘धीस यंग मॅन वन डे विल बिकम द कंट्रीज प्राईम मिनिस्टर...’ (हा तरुण मुलगा एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनेल.)नेहरू खरोखर द्रष्टे होते. त्यांचे भाकीत खरे ठरले. १९९६ मध्ये वाजपेयी पहिल्यांदा १३ दिवसांसाठी पंतप्रधान बनले. नंतर ते १९९८ मध्ये १३ महिन्यांसाठी आणि १९९९ मध्ये पूर्ण पाच वर्षांसाठी पंतप्रधान बनले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधानJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू