शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

Atal Bihari Vajpayee: अटलबिहारींचा 'आठ'वावा प्रताप; या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहील भारत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 5:50 PM

Atal Bihari Vajpayee: पंतप्रधानपदाच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताला दिलेल्या आठ अशा गोष्टी, ज्यासाठी देश कायम त्यांचा ऋणी राहील.... 

नवी दिल्लीः माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं देशाचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त होतेय. कारण, देशहितासाठी त्यांचं योगदान अतुलनीय होतं. पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी भारताला दिलेल्या आठ अशा गोष्टी, ज्यासाठी देश कायम त्यांचा ऋणी राहील....  

१. शिक्षणाच्या अधिकाराचा रचला पाया

शिक्षणाचा अधिकार काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात अंमलात आला असला, तरी त्याची मुहूर्तमेढ अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना रोवली गेली होती. ६ ते १४ या वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देणारं सर्व शिक्षा अभियान त्यांनी सुरू केलं होतं.   

२. भारताला बनवलं अण्वस्त्रसज्ज राष्ट्र

अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता आणि सगळ्याच देशांना भारताची ताकद दाखवून देण्याच्या उद्देशानं अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारने १९९८ मध्ये राजस्थानातील पोखरण इथे अणुचाचणी केली होती. अर्थात, हे अस्त्र भारत प्रथम वापरणार नाही, तर केवळ प्रत्युत्तरादाखल वापरेल, अशी भूमिकाही तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींनी जाहीर केली होती. 

३. दूरसंचार-दूरसंवाद क्रांतीच्या पाठीशी वाजपेयींची दूरदूष्टी 

देशातील दूरसंचार क्रांतीचा पाया भले माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या काळात रचला गेला, पण अटलबिहारी वाजपेयींनी या क्षेत्राला खऱ्या अर्थाने 'अच्छे दिन' दाखवले. अनेक जाणकारही भारतातील मोबाईल क्रांतीचं श्रेय अटलबिहारींना देतात.

४. भूकंप, चक्रिवादळातही जीडीपी भक्कम

अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशावर अनेक संकटं आली. एक प्रलयंकारी भूकंप, दोन चक्रिवादळं, ३० वर्षांतील भीषण दुष्काळ, गल्फ वॉर 2, कारगिल युद्ध आणि संसदेवर हल्ला झाला. परंतु, वाजपेयींच्या कणखर नेतृत्वामुळे जीडीपीला धक्का बसला नाही.

५. मैत्री महासत्तांशी अन् शेजाऱ्यांशी

इस्रायलसोबत राजनैतिक आणि लष्करी सहकार्यासाठी पुढाकार घेऊन अटलबिहारी वाजपेयींनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं होतं. त्यानंतर, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारतभेटीनं आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचं वजन वाढलं. पाकिस्तानशी मैत्रीचे प्रामाणिक प्रयत्नही अटलबिहारींनी केले होते. दिल्ली-लाहोर बससेवा हे त्याचं प्रतीक होतं. पण, पाकिस्तानने दगा दिला होता. 

६. मेट्रो आली हो अंगणी... 

दिल्ली मेट्रो प्रकल्पाला मंजुरी आणि पहिल्या लाइनचं उद्घाटन अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात झालं होतं. 

७. चांद्रयान-१... देश पोहोचला चंद्रावर

देश २००८ पर्यंत चंद्रावर जाण्यासाठी सज्ज होईल, अशी घोषणा अटलबिहारी वाजपेयी यांनी १५ ऑगस्ट २००३ रोजी केली होती.  चांद्रयान-1 प्रकल्पावर त्यांनीच स्वाक्षरी केली होती. त्यानंतर, इस्रोने मागे वळून पाहिलेलं नाही. 

८. देश जोडणारा सुवर्ण चतुष्कोणभारतातील सर्वात मोठा व जगातील ५व्या क्रमांकाचा रस्तेबांधणी प्रकल्प म्हणजे सुवर्ण चतुष्कोण. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाची घोषणा केली.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयी