शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Atal Bihari Vajpayee: अटलबिहारींचा 'आठ'वावा प्रताप; या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहील भारत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 17:51 IST

Atal Bihari Vajpayee: पंतप्रधानपदाच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताला दिलेल्या आठ अशा गोष्टी, ज्यासाठी देश कायम त्यांचा ऋणी राहील.... 

नवी दिल्लीः माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं देशाचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त होतेय. कारण, देशहितासाठी त्यांचं योगदान अतुलनीय होतं. पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी भारताला दिलेल्या आठ अशा गोष्टी, ज्यासाठी देश कायम त्यांचा ऋणी राहील....  

१. शिक्षणाच्या अधिकाराचा रचला पाया

शिक्षणाचा अधिकार काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात अंमलात आला असला, तरी त्याची मुहूर्तमेढ अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना रोवली गेली होती. ६ ते १४ या वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देणारं सर्व शिक्षा अभियान त्यांनी सुरू केलं होतं.   

२. भारताला बनवलं अण्वस्त्रसज्ज राष्ट्र

अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता आणि सगळ्याच देशांना भारताची ताकद दाखवून देण्याच्या उद्देशानं अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारने १९९८ मध्ये राजस्थानातील पोखरण इथे अणुचाचणी केली होती. अर्थात, हे अस्त्र भारत प्रथम वापरणार नाही, तर केवळ प्रत्युत्तरादाखल वापरेल, अशी भूमिकाही तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींनी जाहीर केली होती. 

३. दूरसंचार-दूरसंवाद क्रांतीच्या पाठीशी वाजपेयींची दूरदूष्टी 

देशातील दूरसंचार क्रांतीचा पाया भले माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या काळात रचला गेला, पण अटलबिहारी वाजपेयींनी या क्षेत्राला खऱ्या अर्थाने 'अच्छे दिन' दाखवले. अनेक जाणकारही भारतातील मोबाईल क्रांतीचं श्रेय अटलबिहारींना देतात.

४. भूकंप, चक्रिवादळातही जीडीपी भक्कम

अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशावर अनेक संकटं आली. एक प्रलयंकारी भूकंप, दोन चक्रिवादळं, ३० वर्षांतील भीषण दुष्काळ, गल्फ वॉर 2, कारगिल युद्ध आणि संसदेवर हल्ला झाला. परंतु, वाजपेयींच्या कणखर नेतृत्वामुळे जीडीपीला धक्का बसला नाही.

५. मैत्री महासत्तांशी अन् शेजाऱ्यांशी

इस्रायलसोबत राजनैतिक आणि लष्करी सहकार्यासाठी पुढाकार घेऊन अटलबिहारी वाजपेयींनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं होतं. त्यानंतर, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारतभेटीनं आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचं वजन वाढलं. पाकिस्तानशी मैत्रीचे प्रामाणिक प्रयत्नही अटलबिहारींनी केले होते. दिल्ली-लाहोर बससेवा हे त्याचं प्रतीक होतं. पण, पाकिस्तानने दगा दिला होता. 

६. मेट्रो आली हो अंगणी... 

दिल्ली मेट्रो प्रकल्पाला मंजुरी आणि पहिल्या लाइनचं उद्घाटन अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात झालं होतं. 

७. चांद्रयान-१... देश पोहोचला चंद्रावर

देश २००८ पर्यंत चंद्रावर जाण्यासाठी सज्ज होईल, अशी घोषणा अटलबिहारी वाजपेयी यांनी १५ ऑगस्ट २००३ रोजी केली होती.  चांद्रयान-1 प्रकल्पावर त्यांनीच स्वाक्षरी केली होती. त्यानंतर, इस्रोने मागे वळून पाहिलेलं नाही. 

८. देश जोडणारा सुवर्ण चतुष्कोणभारतातील सर्वात मोठा व जगातील ५व्या क्रमांकाचा रस्तेबांधणी प्रकल्प म्हणजे सुवर्ण चतुष्कोण. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाची घोषणा केली.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयी