शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

Atal Bihari Vajpayee Death: अमेरिकेचा दबाव झुगारुन वाजपेयींनी केली पोखरणमध्ये अणुचाचणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 19:48 IST

Atal Bihari Vajpayee Death: 13 मे 1998 आणि 15 मे 1998 या काळात अमेरिकेला थांगपत्ता लागू न देता वाजपेयी सरकारने पोखरणमध्ये जमिनीखाली 5 अणुचाचण्या घेतल्या. सत्ता प्राप्तीनंतर वाजपेयींनी घेतलेल्या चाचण्यांनी जगभरात खळबळ उडाली होती.

नवी दिल्ली : अटलबिहारी वाजपेयीच्या कार्यकाळात भारतानं एक यशस्वी पाऊल उचललं. 1995च्या वाजपेयी सरकारनंतर 1996 ते 98दरम्यान तिसऱ्या आघाडीला सरकार स्थापनेच्या दोन संधी मिळाल्या. देवैगोडा आणि इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले. ही दोन्ही सरकारे फार काळ टिकली नाहीत. त्यानंतर 1998च्या निवडणुकांत भाजपा पुन्हा सत्तेचा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 

भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापलं. परंतु 1998च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला आणि वाजपेयी सरकार कोसळलं. त्यानंतर विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर भारतात पुन्हा लोकसभा निवडणुका लागल्या. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले. 1998मध्ये रालोआचं सरकार असताना वाजपेयींनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. 13 मे 1998 आणि 15 मे 1998 या काळात अमेरिकेला थांगपत्ता लागू न देता वाजपेयी सरकारने पोखरणमध्ये जमिनीखाली 5 अणुचाचण्या घेतल्या. सत्ता प्राप्तीनंतर वाजपेयींनी घेतलेल्या चाचण्यांनी जगभरात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे अमेरिकेला हा मोठा धक्का होता. कारण भारतानं या चाचण्या अमेरिकेच्या हेरगिरी करणा-या उपग्रहाला चुकवून केल्या होत्या. त्यानंतर 2 आठवड्यांत पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारतानं स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी घेतलेल्या अणुचाचण्यांचं समर्थन केलं, तर अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपिय महासंघानं भारताच्या चाचण्यांना विरोध दर्शवून अनेक निर्बंध लादले. परंतु वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला याचा फारसा फटका बसला नाही.

या पोखरणच्या अणुचाचण्या भाजपा आणि वाजपेयींसाठी फायदेशीर ठरल्या. अटलजींच्या पंतप्रधानपदाची सहा वर्षे अत्यंत वादळी अशी होती. इंदिरा गांधींनंतर अणुचाचणी घेण्याचे धाडस दाखवणारे दुसरे पंतप्रधान म्हणजे अटल बिहारी वाजपेयी ठरले होते. जय जवान, जय किसानसह वाजपेयींनी जय विज्ञान असा नवा नारा देशाला बहाल केला होता. भारताला अण्वस्त्रांनी सुसज्ज करण्यात वाजपेयींचा मोठा वाटा होता. जागतिक दबाव आणि निर्बंधाची त्यांनी कधीही तमा बाळगली नव्हती. त्यामुळेच भारताला एवढं मोठं यश मिळवता आलं. पाकिस्तान, चीन या सारखे बेभरवशाचे शेजारी देश असताना अण्वस्त्र सज्ज होणं ही भारताची गरज होती. अणुचाचणी घेऊन वाजपेयींनी अख्ख्या जगाला भारतीय लष्कराचं सामर्थ्य दाखवून दिले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी