शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

Atal Bihari Vajpayee Death: अमेरिकेचा दबाव झुगारुन वाजपेयींनी केली पोखरणमध्ये अणुचाचणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 19:48 IST

Atal Bihari Vajpayee Death: 13 मे 1998 आणि 15 मे 1998 या काळात अमेरिकेला थांगपत्ता लागू न देता वाजपेयी सरकारने पोखरणमध्ये जमिनीखाली 5 अणुचाचण्या घेतल्या. सत्ता प्राप्तीनंतर वाजपेयींनी घेतलेल्या चाचण्यांनी जगभरात खळबळ उडाली होती.

नवी दिल्ली : अटलबिहारी वाजपेयीच्या कार्यकाळात भारतानं एक यशस्वी पाऊल उचललं. 1995च्या वाजपेयी सरकारनंतर 1996 ते 98दरम्यान तिसऱ्या आघाडीला सरकार स्थापनेच्या दोन संधी मिळाल्या. देवैगोडा आणि इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले. ही दोन्ही सरकारे फार काळ टिकली नाहीत. त्यानंतर 1998च्या निवडणुकांत भाजपा पुन्हा सत्तेचा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 

भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापलं. परंतु 1998च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला आणि वाजपेयी सरकार कोसळलं. त्यानंतर विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर भारतात पुन्हा लोकसभा निवडणुका लागल्या. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले. 1998मध्ये रालोआचं सरकार असताना वाजपेयींनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. 13 मे 1998 आणि 15 मे 1998 या काळात अमेरिकेला थांगपत्ता लागू न देता वाजपेयी सरकारने पोखरणमध्ये जमिनीखाली 5 अणुचाचण्या घेतल्या. सत्ता प्राप्तीनंतर वाजपेयींनी घेतलेल्या चाचण्यांनी जगभरात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे अमेरिकेला हा मोठा धक्का होता. कारण भारतानं या चाचण्या अमेरिकेच्या हेरगिरी करणा-या उपग्रहाला चुकवून केल्या होत्या. त्यानंतर 2 आठवड्यांत पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारतानं स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी घेतलेल्या अणुचाचण्यांचं समर्थन केलं, तर अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपिय महासंघानं भारताच्या चाचण्यांना विरोध दर्शवून अनेक निर्बंध लादले. परंतु वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला याचा फारसा फटका बसला नाही.

या पोखरणच्या अणुचाचण्या भाजपा आणि वाजपेयींसाठी फायदेशीर ठरल्या. अटलजींच्या पंतप्रधानपदाची सहा वर्षे अत्यंत वादळी अशी होती. इंदिरा गांधींनंतर अणुचाचणी घेण्याचे धाडस दाखवणारे दुसरे पंतप्रधान म्हणजे अटल बिहारी वाजपेयी ठरले होते. जय जवान, जय किसानसह वाजपेयींनी जय विज्ञान असा नवा नारा देशाला बहाल केला होता. भारताला अण्वस्त्रांनी सुसज्ज करण्यात वाजपेयींचा मोठा वाटा होता. जागतिक दबाव आणि निर्बंधाची त्यांनी कधीही तमा बाळगली नव्हती. त्यामुळेच भारताला एवढं मोठं यश मिळवता आलं. पाकिस्तान, चीन या सारखे बेभरवशाचे शेजारी देश असताना अण्वस्त्र सज्ज होणं ही भारताची गरज होती. अणुचाचणी घेऊन वाजपेयींनी अख्ख्या जगाला भारतीय लष्कराचं सामर्थ्य दाखवून दिले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी