शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

Atal Bihari Vajpayee : वो सुबह कभी तो आएगी..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 05:30 IST

अटलबिहारी वाजपेयी यांचा खासदार म्हणून दिल्लीशी संपर्क आला तो १९५७ साली. त्या वेळी ते व त्यांचे सहकारी चांदणी चौक, पहाडगंज, अजमेरी गेट ते झंडेवाला अशा ठिकाणी नेहमी जात असत.

नवी दिल्ली - अटलबिहारी वाजपेयी यांचा खासदार म्हणून दिल्लीशी संपर्क आला तो १९५७ साली. त्या वेळी ते व त्यांचे सहकारी चांदणी चौक, पहाडगंज, अजमेरी गेट ते झंडेवाला अशा ठिकाणी नेहमी जात असत. चांदणी चौकात त्यांचे वास्तव्य होते. सुमारे ६० वर्षे अटलजींचे दिल्लीशी ॠणानुबंध होते. वाजपेयी देशाचे नेते होते. लोकप्रिय होते. दिल्लीवर त्यांचे विशेष प्रेम. इथले गल्लीबोळ त्यांना माहीत होते. खाऊगल्ल्यांपासून ते चित्रपटगृहांपर्यंत वाजपेयींची फिरस्ता असे.अटलजी व जगदीश प्रसाद माथुर जनसंघातर्फे प्रथमच निवडून आले होते. दोन्ही नेते चांदणी चौकातच छोट्याशा खोलीत राहात असत. जवळ फारसे पैसे नसायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते व पुढे पूर्णवेळ राजकारणी असल्याने वाजपेयींकडे पैसे नसतच. त्यामुळे खासदार असतानाही ते पायीच संसदेत येत. खासदार झाल्यानंतर सहा महिन्यांनी अटलजींनी पहिल्यांदा त्यांच्या या सहकाऱ्यास रिक्षाने संसदेत जाऊ , असे सांगितले. माथुर यांना आश्चर्य वाटले. खासदारपदाचे सहा महिन्यांचे एकत्रित वेतन मिळाल्यानेच रिक्षाची चैन करण्याची इच्छा वाजपेयींनी व्यक्त केली. जनसंघ-भाजपाच्या विस्तारासाठी वाजपेयींनी सायकलवरून अनेक शहरे पिंजून काढली. त्यांचा साधेपणा दिल्लीतही कायम राहिला.त्यांच्यासोबत १९५३पासून असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना त्या गोष्टी आजही लख्खपणे आठवतात. त्या वेळी जनसंघाचे कार्यालय अजमेरी गेट येथे होते. अडवाणी आणि अटलजी नेहमी अजमेरी गेट ते झंडेवालापर्यंत टांग्यातून भोजनासाठी जात असत.दिल्लीजवळील नयाबांस येथील पोटनिवडणुकीत जनसंघाला यश मिळाले नाही. त्या वेळी त्यांनी निराश झालेल्या अडवाणी यांना जवळच्याच पहाडगंजमध्ये चित्रपट पाहण्यासाठी नेले. तेथे कोणता चित्रपट प्रदर्शित झाला होता, ते दोघांनाही माहीत नव्हते. राज कपूर यांचा ‘वो सुबह कभी तो आएगी’ हा चित्रपट सुरू होता. त्या चित्रपटाचा फलक पाहून अडवाणी वाजपेयींना म्हणाले, ‘हम आज हार गये, लेकिन देखना, वो सुबह फिर जरुर आएगी.’ आणि खरोखरच जनसंघाच्या काळात नव्हे, तरी भाजपासाठी ती सुबह आली आणि वाजपेयी पंतप्रधानही झाले!

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीPoliticsराजकारण