शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कोरोना स्थितीवर चर्चेसाठी विधानसभा अधिवेशन हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 05:07 IST

गेहलोत यांची मागणी, पायलट यांना अडचणीत आणण्यासाठी खेळी

जयपूर : विश्वासदर्शक ठराव मंजूर करवून घेण्यासाठी अधिवेशगन बोलावण्यास राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र तयार नसल्याचे पाहून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी वेगळी खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी ३१ जुलैपासून ६ दिवसांचे अधिवेशन बोलावण्यात यावे, असे पत्र त्यांनी राज्यपालांना पाठविले आहे.या अधिवेशनात सरकारला ६ महत्त्वाची विधेयके संमत करून घ्यायची आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना कळविले आहे. या संपूर्ण पत्रात त्यांनी विश्वासदर्शक ठरावाचा अजिबात उल्लेख केलेला नाही, हे विशेष. राजस्थानच्या विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर उद्या, सोमवार सुनावणी होणार आहे. त्यात अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा उच्च न्यायालयाला अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. सचिन पायलट व १८ बंडखोर आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये त्यांनी जी नोटीस बजावली आहे, त्यावर निर्णय घेऊ नये, असे उच्च न्यायालयाने सांगितले आहे. मात्र, निकाल प्रतिकूल लागला तरी विधानसभेचे अधिवेशन ३१ जुलैपासून घेण्यावर गेहलोत आणि समर्थक ठाम आहेत. या अधिवेशनात विधेयके मंजूर करून घेण्यासाठी व्हीप आणायचा आणि पायलट गटाने तो न जुमानल्यास त्यांची आमदारकी रद्द करायची, अशी गेहलोत गटाची योजना आहे. मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपाल नाकारू शकत नाहीत, राज्यघटनेनुसार शिफारस मान्य करणे राज्यपालांवर बंधनकारक आहे, असे गेहलोत गटाचे म्हणणे आहे. मात्र इतक्यात अधिवेशन बोलावणे शक्य नाही, २१ दिवसांची नोटीस द्यायला हवी, असे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते. तसेच न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर विधानसभेचे अधिवेशन घ्यावे, असा सल्लाही कलराज मिश्रा यांनी गेहलोत यांना दिल्याचे सांगण्यात आले.लोकशाही रक्षणासाठी काँग्रेसची ‘डिजिटल मोहीम’केवळ राजस्थानमधीलच नव्हे तर देशाच्या अन्य राज्यांतील विरोधी पक्षांची लोकनियुक्त सरकारे पाडण्याचा चंग बांधून भारतीय जनता पक्ष लोकशाही मूल्ये व संविधानाची राजरोस हत्या करत आहे, असा आरोप करत काँग्रेसने भाजपाचे ‘कपट व फसवणुकी’चे हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी ‘स्पीक अप फॉर डेमॉक्रसी’ ही देशव्यापी डिजिटल मोहीम सुरू केली.‘राज्यपालांना हाताशी धरून’ राजस्थानचे अशोक गेहलोत सरकार पाडण्याच्या भाजपाच्या निंद्य मनसुब्यांचा निषेध करण्यासाठी सोमवारी सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते तेथील राजभवनांसमोर निदर्शने करतील, असेही पक्षाने जाहीर केले. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सकाळी पहिले टष्ट्वीट करून ‘स्पीक अप फॉर डेमॉक्रसी’ मोहिमेची सुरुवात केली.नेतृत्वाचा कस संकटातच लागतोनेतृत्वाचा कस संकटकाळातच लागत असतो. देशापुढे कोरोनाचे संकट असताना लोकांच्या हितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. पण लोकांनी निवडून दिलेली सरकारे पाडण्याच्या प्रयत्नांतून केंद्रातील भाजपा सरकारचा हेतू व चारित्र्य स्पष्ट होते. लोकच याला उत्तर देतील.-प्रियांका गांधी, काँग्रेस सरचिटणीस

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थान