शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

"जनतेचा आशीर्वाद मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो हे मान्य करतो"; काँग्रेसने स्वीकारला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 17:04 IST

Congress RS Surjewala And Assembly Elections 2022 Result : पंजाबमध्येही आपनं जोरदार मुसंडी घेत काँग्रेसचा पराभव केला आहे. अन्य राज्यांमध्येही काँग्रेसला काही चांगली कामगिरी करता आलेली नाही.

नवी दिल्ली - काँग्रेसला पाचही राज्यात मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पराभव झाला आहे. याच दरम्यान काँग्रेसने आपल्या पराभव स्वीकारला आहे. "जनतेचा आशीर्वाद मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो हे मान्य करतो" असं म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते आर. एस. सुरजेवाला (Congress RS Surjewala) यांनी निवडणुकांच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. "पाच राज्यांचे निकाल काँग्रेस पक्षाच्या अपेक्षेविरुद्ध आले आहेत, पण जनतेचा आशीर्वाद मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो हे आम्ही मान्य करतो. सोनिया गांधी यांनी निकालाचे आत्मपरीक्षण करण्यासाठी लवकरच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे" असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. 

पंजाबमध्येही आपनं जोरदार मुसंडी घेत काँग्रेसचा पराभव केला आहे. अन्य राज्यांमध्येही काँग्रेसला काही चांगली कामगिरी करता आलेली नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी आपण जनतेचा निर्णय स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे. "आम्ही जनतेचा निर्णय स्वीकारत आहोत. ज्या लोकांना जनतेनं कौल दिला त्यांना हार्दिक शुभेच्छा. मेहनतीसाठी आणि समर्पणासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि वॉलेंटिअर्स यांना शुभेच्छा. आम्ही यातून शिकू आणि जनहितासाठी काम करत राहू," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काँग्रेसच्या उमेदवार मालविका सूद पराभूत

पंजाबच्या मोगा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार मालविका सूद यांचा आपच्या डॉ अमनदीप कौर अरोरा यांनी २०,००० हून अधिक मतांनी पराभव केला आहे. लोकांना राजकारणात एक पर्याय मिळाला आणि पंजाबच्या जनतेने त्या पर्यायाला संधी दिली असं आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. तसेच पंजाबवालो तुस्सी कमाल कर दित्ता असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यासोबतच  लोकांनी आमच्यावर खूप विश्वास ठेवला आहे, आम्ही तो तोडणार नाही. आम्ही या देशाचे राजकारण बदलू असंही म्हटलं आहे. 

"उत्तराखंडच्या जनतेवर विजय मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न थोडे कमी पडले"

उत्तराखंडच्या जनतेवर विजय मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न थोडे कमी पडले. आम्हाला खात्री होती की लोक बदलाला मतदान करतील, आमच्या प्रयत्नांमध्ये नक्कीच कमतरता असेल, मी ते स्वीकारतो आणि पराभवाची जबाबदारी घेतो  असं काँग्रेस नेते हरीश रावत यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्यासाठी निकाल खूप आश्चर्यकारक आहेत. मला समजू शकत नाही की एवढ्या प्रचंड महागाईनंतर, जर हा जनतेचा आदेश असेल, तर लोककल्याण आणि सामाजिक न्यायाची व्याख्या काय आहे?  यानंतर लोक 'भाजपा जिंदाबाद' म्हणतील हे मला समजत नाही असंही ते म्हणाले. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीPunjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२