शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'मोदीजी मागच्या दारानं सोनिया गांधींना पंतप्रधान बनवताहेत', अरविंद केजरीवाल असं का म्हणाले? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 14:06 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. केजरीवाल संपूर्ण गुजरात पिंजून काढत आहेत. अहमदाबादमध्ये आयोजित पक्षाच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना केजरीवालांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच भाजपाकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. 

"आम आदमी पक्षाकडून गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी मेधा पाटकर या उमेदवार असणार आहेत असं मी ऐकलं. भाजपावाले असं बोलत आहेत. त्यावर माझं उत्तर असं आहे की मीही ऐकलंय की मोदीजी मागच्या दारानं सोनिया गांधींना पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी प्रयत्न करत आहेत", अशा खोचक शब्दात केजरीवालांनी भाजपाच्या आरोपांना उत्तर दिलं. गुजरातमधून भाजपाचा सूपडासाफ होणार आहे आणि आम आदमी पक्षाचं सरकार येणार आहे असा दावा केजरीवालांनी केला. 

"मी गेल्या काही महिन्यांपासून गुजरामध्ये फिरतोय आणि लोकांना भेटतोय. वकील, ऑटो रिक्षाचालक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की गुजरात सरकारकडून खूप भ्रष्टाचार होत आहे. व्यापारी आणि उद्योगपतींना धाड टाकण्याची धमकी दिली जात आहे. लोकांना कोणतंही सरकारी काम करायचं असेल तर लाच द्यावी लागते. तसंच सरकार विरोधात काही बोललं तर त्यांना धमकावलं जातं. व्यापाऱ्यांना त्यांचा धंदा बंद करुन टाकण्याची धमकी दिली जात आहे. सर्व ठिकाणी भ्रष्टाचार आणि गुंडगिरी वाढली आहे. पण आज मी आश्वासन देऊ इच्छितो की आम आदमी पक्षाचं सरकार आलं तर भ्रष्टाचामुक्त आणि भयमुक्त प्रशासन आम्ही देऊ", असं केजरीवाल म्हणाले. 

केजरीवालांनी गुजरातच्या जनतेला दिली महत्वाची आश्वासनं

१. आमचा कोणीही मुख्यमंत्री, मंत्री, आमदार असो, आमचा कोणताही खासदार असो किंवा इतर कुणीही असो कोणालाही भ्रष्टाचार करू देणार नाही. भ्रष्टाचार केला तर तुरुंगात पाठवू. गुजरातच्या जनतेचा पैसा गुजरातच्या विकासावर खर्च केला जाईल.

२. 'आप'चे सरकार आल्यावर सरकारमध्ये प्रत्येक व्यक्तीचे काम कोणतीही लाच न घेता होईल. अशी व्यवस्था करणार की सरकारी कार्यालयांचे खेटे घालावे लागणार नाहीत. सरकार तुमच्या घरी येईल. दिल्लीत डोअरस्टेप डिलिव्हरी योजना लागू आहे.

३. नेते, मंत्री, आमदार यांचे सर्व काळे धंदे बंद होतील. विषारी दारू विकली जात आहे ते कायमस्वरुपी बंद करुन टाकू.

४. पेपरफुटी थांबवली जाईल, मागील पेपर फुटीची प्रकरणे उघडून दोषींना तुरुंगात टाकले जाईल.

५. आधीच्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सर्व मोठ्या घोटाळ्यांची चौकशी केली जाईल. लुटलेले पैसे परत मिळतील आणि त्या पैशातून तुमच्यासाठी शाळा-रुग्णालये बांधली जातील, वीज-रस्ते चालतील.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप