शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

'मोदीजी मागच्या दारानं सोनिया गांधींना पंतप्रधान बनवताहेत', अरविंद केजरीवाल असं का म्हणाले? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 14:06 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. केजरीवाल संपूर्ण गुजरात पिंजून काढत आहेत. अहमदाबादमध्ये आयोजित पक्षाच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना केजरीवालांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच भाजपाकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. 

"आम आदमी पक्षाकडून गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी मेधा पाटकर या उमेदवार असणार आहेत असं मी ऐकलं. भाजपावाले असं बोलत आहेत. त्यावर माझं उत्तर असं आहे की मीही ऐकलंय की मोदीजी मागच्या दारानं सोनिया गांधींना पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी प्रयत्न करत आहेत", अशा खोचक शब्दात केजरीवालांनी भाजपाच्या आरोपांना उत्तर दिलं. गुजरातमधून भाजपाचा सूपडासाफ होणार आहे आणि आम आदमी पक्षाचं सरकार येणार आहे असा दावा केजरीवालांनी केला. 

"मी गेल्या काही महिन्यांपासून गुजरामध्ये फिरतोय आणि लोकांना भेटतोय. वकील, ऑटो रिक्षाचालक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की गुजरात सरकारकडून खूप भ्रष्टाचार होत आहे. व्यापारी आणि उद्योगपतींना धाड टाकण्याची धमकी दिली जात आहे. लोकांना कोणतंही सरकारी काम करायचं असेल तर लाच द्यावी लागते. तसंच सरकार विरोधात काही बोललं तर त्यांना धमकावलं जातं. व्यापाऱ्यांना त्यांचा धंदा बंद करुन टाकण्याची धमकी दिली जात आहे. सर्व ठिकाणी भ्रष्टाचार आणि गुंडगिरी वाढली आहे. पण आज मी आश्वासन देऊ इच्छितो की आम आदमी पक्षाचं सरकार आलं तर भ्रष्टाचामुक्त आणि भयमुक्त प्रशासन आम्ही देऊ", असं केजरीवाल म्हणाले. 

केजरीवालांनी गुजरातच्या जनतेला दिली महत्वाची आश्वासनं

१. आमचा कोणीही मुख्यमंत्री, मंत्री, आमदार असो, आमचा कोणताही खासदार असो किंवा इतर कुणीही असो कोणालाही भ्रष्टाचार करू देणार नाही. भ्रष्टाचार केला तर तुरुंगात पाठवू. गुजरातच्या जनतेचा पैसा गुजरातच्या विकासावर खर्च केला जाईल.

२. 'आप'चे सरकार आल्यावर सरकारमध्ये प्रत्येक व्यक्तीचे काम कोणतीही लाच न घेता होईल. अशी व्यवस्था करणार की सरकारी कार्यालयांचे खेटे घालावे लागणार नाहीत. सरकार तुमच्या घरी येईल. दिल्लीत डोअरस्टेप डिलिव्हरी योजना लागू आहे.

३. नेते, मंत्री, आमदार यांचे सर्व काळे धंदे बंद होतील. विषारी दारू विकली जात आहे ते कायमस्वरुपी बंद करुन टाकू.

४. पेपरफुटी थांबवली जाईल, मागील पेपर फुटीची प्रकरणे उघडून दोषींना तुरुंगात टाकले जाईल.

५. आधीच्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सर्व मोठ्या घोटाळ्यांची चौकशी केली जाईल. लुटलेले पैसे परत मिळतील आणि त्या पैशातून तुमच्यासाठी शाळा-रुग्णालये बांधली जातील, वीज-रस्ते चालतील.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप