शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

४ राज्यं अन् एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदान; दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 07:12 IST

चार राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशात मतदान; ११ कोटी मतदार बजावणार हक्क; देवभूमीपासून चहाच्या मळ्यापर्यंत चर्चा निवडणुकीची

कोलकाता/गुवाहाटी/चेन्नई: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ४ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा सर्वांत माेठा टप्पा मंगळवारी पार पडणार आहे. तब्बल ४७५ जागांसाठी ६ तारखेला मतदान हाेणार आहे. केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरी येथे एकाच टप्प्यात मतदान पूर्ण हाेणार असून पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान आहे. एकूण ६२९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून सुमारे ११ काेटी मतदारांच्या हाती त्यांचे भवितव्य आहे. देशभरातल्या दिग्गज नेत्यांनी या टप्प्यात पाचही क्षेत्रांमध्ये जाेरदार प्रचार केला. ‘सीएए’, शेतकरी कायदे, शबरीमाला मंदिर, चहा कामगारांचे प्रश्न आदी अनेक मुद्दे या टप्प्यात प्रचारादरम्यान उचलण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र माेदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, याेगी आदित्यनाथ, शिवराजसिंह चाैहान, स्मृती इराणी, जे. पी. नड्डा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, अशाेक गेहलाेत, भुपेश बघेल, कमल नाथ, अशाेक चव्हाण, ममता बॅनर्जी आदी नेत्यांनी या टप्प्यात जाेरदार प्रचार केला. सर्वांत माेठा आणि महत्त्वाचा टप्पा असल्यामुळे देवभूमीपासून चहाच्या मळ्यांपर्यंत मतदार काेणाला काैल देतात, याचा फैसला मंगळवारी मतदार करणार आहेत.पश्चिम बंगालतिसऱ्या टप्प्यात हावडा, हुगळी आणि दक्षिण चौबीस परगणा या जिल्ह्यातील ३१ जागांवर मतदान होणार आहे. प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये वातावरण चांगलेच तापले.  प्रचारामध्ये ‘सीएए’चा मुद्दा सर्वच प्रमुख पक्षांनी उचलला. याशिवाय शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरूनही भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जुगलबंदी दिसून आली. माेदी विरुद्ध ममता असे द्वंद्व पश्चिम बंगालच्या प्रचारात प्रामुख्याने दिसून आले. अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून ममतांनी केंद्र सरकारवर अनेकदा निशाणा साधला.प्रमुख उमेदवारआशिमा पात्रा-     टीएमसीस्वपन दासगुप्ता-     भाजपतनुश्री चक्रवर्ती-     भाजपशक्ती माेहन मलिक-     सीपीआय (एम)आसामआसाममध्ये अखेरच्या टप्प्यात ४० जागांवर मतदान हाेणार आहे. भाजप आणि काँग्रेस या दाेन्ही पक्षांसाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. आसाममधील बाेडाेलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील मतदारसंघांचा या टप्प्यात समावेश आहे. या टप्प्यात बाेडाेलँड, ‘सीएए’ आणि अवैध स्थलांतरितांच्या मुद्द्यांवरून प्रचार तापला हाेता. या भागात पूरस्थितीचाही प्रश्न गंभीर आहे. ‘ईव्हीएम’चा मुद्दा विराेधकांनी प्रचारादरम्यान उचलून धरला हाेता. तिसऱ्या टप्प्यातील मतदान भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.प्रमुख उमेदवारहेमंतविश्व शर्मा-भाजपउरखाव ब्रम्हा - युपीपीएलतमिळनाडूतमिळनाडूमध्ये जे. जयललिता आणि एम. करुणानिधी या दाेन दिग्गजांच्या निधनानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. काेराेना महामारीमुळे उभे ठाकलेले आर्थिक संकट आणि बेराेजगारी हे मुद्दे सर्वच पक्षांच्या जाहीरनाम्यात दिसत हाेते. कट्टूपल्ली येथील मच्छिमारांचे आंदाेलन, स्टारलाईट प्रकल्पावरून झालेला गाेळीबार तसेच वणियार समाजाला जाहीर केलेले आरक्षण हे मुद्दे प्रचारात ठळकपणे दिसत हाेते. कमल हासन यांच्यासाठी मुलगी अक्षरा आणि पुतणी अभिनेत्री सुहासिनी यांनीही प्रचार केला.प्रमुख उमेदवारई. पलानीस्वामी- एआयएडीएमकेएम. के. स्टॅलिन- डीएमकेटी.टी.व्ही. दिनकरन- एएमएमकेकमल हासन- एमएनएमखुशबू सुंदर- भाजपकेरळडाव्यांची सत्ता असलेल्या केरळच्या देवभूमीत मतदार उजवा काैल देतात का, याचा फैसला २ काेटी ७४ लाख मतदार करणार आहेत. निवडणुकीच्या प्रचारात शबरीमाला मंदिरासह साेन्याच्या तस्करीचा मुद्दा विराेधकांनी उचलून धरला, तर सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या विकासकामांचे दावे करून मतदारांना काैल मागितला आहे. हेच मुद्दे जाहीराम्यांमध्येही दिसले. नेहमी दुहेरी सामना रंगणाऱ्या केरळमध्ये भाजपमुळे अनेक ठिकाणी तिरंगी लढत हाेणार आहे.प्रमुखउमेदवारविजयन- सीपीआय (एम)ओमेन चंडी-     काँग्रेसरमेश चेन्नीथला-     काँग्रेसई. श्रीधरन-     भाजपसुरेश गाेपी-     भाजपपुदुच्चेरीसत्ताधारी काँग्रेसच्या ४ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे व्ही. नारायणसामी यांचे सरकार पडले. त्यामुळे या निवडणुकीत बंडखाेरीचा मुद्दा चर्चेत राहिला. शिक्षण, पर्यटन, महिला सबलीकरण, राेजगार निर्मिती आदी मुद्द्यांवर निवडणूक लढविण्यात आली. पुदुच्चेरीकडे भाजप हे दक्षिणेतील प्रवेशद्वार म्हणून पाहत आहे. प्रमुखउमेदवारएन. रंगास्वामी- एआयएनआरसीव्ही. स्वामीनाथम- भाजपपी. सेल्वनादेन- काँग्रेसएम. कन्नन- काँग्रेसपाच राज्यातील एकूण मतदारराज्य    जागा    उमेदवार    मतदार            (काेटींमध्ये)पश्चिम बंगाल-    ३१    २०५    ०.७९आसाम-    ४०    ३५७    ०.७९तमिळनाडू-    २३४    ४४४९    ६.२९केरळ-     १४०    ९५८    २.७४पुदुच्चेरी-    ३०    ३२४    ०.१० 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Puducherry Assembly Elections 2021पुदुचेरी विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१