शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Assembly Election 2022: चार राज्यांत आम्हीच जिंकणार, उत्तर प्रदेशात आमच्या पाठिंब्याविना सरकार नाही बनणार, काँग्रेसचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 18:51 IST

Assembly Election 2022: चार राज्यांत आम्हीच सरकार स्थापन करणार असून, उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार बनणार नाही असा दावा, Congressचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

नवी दिल्ली - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार पाच राज्यांमध्ये  एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे, तर त्याचा निकाल हा १० मार्च रोजी लागणार आहे. दरम्यान, निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने दंड ठोपटले आहेत. चार राज्यांत आम्हीच सरकार स्थापन करणार असून, उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार बनणार नाही असा दावा, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

पाच राज्यांमधील निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर रणदीप सुरजेवाला म्हणाले की, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये आम्हीच सरकार स्थापन करणार आहोत. तसेच प्रियंका गांधींनी घेतलेल्या मेहनतीनंतर आता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन होणार नाही.

यावेळी सुरजेवाला यांनी पंजाबमधील काँग्रेसच्या नेतृत्वाबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. पंजाबमध्ये चरणजीतसिंग चन्नी हे आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहे. तसेच पक्षाच्या संघटनेचे प्रमुख म्हणून नवज्योतसिंग सिद्धू हे आमचा चेहरा आहेत. हे १ आणि १ मिळून ११ होतात. तर प्रचार समितीचे प्रमुख म्हणून सुनील जाखड हे आमचा चेहरा आहेत. हे तिघे मिळून, १११ होतात.

आज ज्या पाच राज्यांमधील निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यापैकी पंजाबमध्ये २०१७ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला होता. तर गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात अपयश आले होते. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मात्र काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. 

टॅग्स :congressकाँग्रेसUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२