शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

"2041 पर्यंत आसाम मुस्लीम राज्य होणार, कुणीही रोखू शकत नाही; राहुल गांधी ॲम्बेसेडर झाले, तर..." - CM सरमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 18:01 IST

'आकडेवारीचा विचार करता, आसाममध्ये मुस्लीम लोकसंख्या 40 टक्के आहे आणि 2041 पर्यंत आसाम मुस्लीम बहुसंख्य राज्य होईल. हे वास्तव आहे आणि हे कुणीही रोखू शकत नाही.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मुस्लीम लोकसंख्येसंदर्भात मोठा दावा केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सरमा यांनी शुक्रवारी दावा केला की, त्यांच्या राज्यातील मुस्लीम लोकसंख्या दर 10 वर्षांनी सुमारे 30 टक्क्यांपर्यंत वाढत आहे.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, 'आकडेवारीचा विचार करता, आसाममध्ये मुस्लीम लोकसंख्या 40 टक्के आहे आणि 2041 पर्यंत आसाम मुस्लीम बहुसंख्य राज्य होईल. हे वास्तव आहे आणि हे कुणीही रोखू शकत नाही.

राहुल गांधींवर निशाणा - मुख्यमंत्री सरमा म्हणाले, "हिंदू समाजाची लोकसंख्या दर 10 वर्षांनी 16 टक्क्यांपर्यंत वाढत आहे. आपल्या सरकारने मुस्लीम लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाटी पावले उचलली आहेत. उपहासात्मकपणे बोलताना सरमा म्हणाले, 'मुस्लिमांची लोकसंख्या वाढ रोखण्यात काँग्रेस सर्वात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जर राहुल गांधी लोकसंख्या नियंत्रणाचे ब्रँड ॲम्बेसेडर झाले, तर यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. कारण समाज केवळ त्यांचेच ऐकतो."

सरमा यांच्या दाव्यावर विरोधक आक्रमक - सरमा यांच्या या विधानावर बोलताना आसम कांग्रेसाध्यक्ष भूपेन कुमार व्होरा म्हणाले, मुख्यमंत्री आपले अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारची निधानं करत आहेत. एवढेच नाही, तर विरोधकांनी या आकडेवारीचा स्त्रोत जाणण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. तसेच आसाममध्ये कुठल्याही प्रकारची जनगणना झाली नसल्याचेही म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAssamआसामcongressकाँग्रेस