शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

आसाममध्ये एकापेक्षा अधिक विवाह करण्यावर येणार बंदी, मुख्यमंत्री म्हणाले, याच वर्षी लागू होणार कायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 20:25 IST

Marriage: आसाममध्ये बहुविवाह पद्धत संपुष्टात आणण्यासाठी कायदा तयार करण्याबाबत विधानसभेच्या अधिकारांची माहिती घेण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या एका तज्ज्ञांच्या समितीने रविवारी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना आपला अहवाल सुपूर्द केला आहे.

आसाममध्ये बहुविवाह पद्धत संपुष्टात आणण्यासाठी कायदा तयार करण्याबाबत विधानसभेच्या अधिकारांची माहिती घेण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या एका तज्ज्ञांच्या समितीने रविवारी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना आपला अहवाल सुपूर्द केला आहे. शर्मा यांनी समितीकडून त्यांना अहवाल सोपवण्याचे आणि कागदपत्रांचे फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. मात्र या अहवाताल काय आहे, तसेच त्यातून काय शिफारशी करण्यात आल्या आहेत, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. 

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं की, तज्ज्ञांच्या समितीने आज आपला अहवाल राज्य सरकारकडे सपूर्द केला आहे. या आर्थिक वर्षाच्या आतच त्याबाबतचा कायदा लागू होणार आहे. आम्ही आमदारंना तो वाचण्यासाठी आणि त्याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ देऊ इच्छितो. ,समितीने आपल्या अहवालामध्ये सांगितले की, राज्य सरकार हा कायदा बनवण्यासाठी सक्षम आहे. 

मुख्यमंत्र्यांनी याबरोबरच सांगितले की, आसाम, जाती, पंथ किंवा धर्म यांच्या पलिकडे जाऊन महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी १२ मे रोजी निवृत्त न्यायमूर्ती रुमी कुमारी फुकन यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. फुकन यांच्याबरोबर समितीतील इतर सदस्यांमध्ये राज्याचे महाधिवक्ता देवजीत सैकिया, वरिष्ठ पोलीस अतिरिक्त महाधिवक्ता नलिन कोहली आणि वरिष्ठ अधिवक्ता नकीब उर जमां यांचा समावेश होता.

१८ जुलै रोजी आसाम सरकारने समितीचा कार्यकाळ एका महिन्याने वाढवून १२ ऑगस्ट केली होती. समितीलआ आपला प्राथमिक अहवाल सोपवण्यासाठई ६० दिवसांची वेळ देण्यात आली होती. या समितीकडे समान नागरी कायद्यासंदर्भात राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित घटनेतील कलम २५ आणि मुस्लिम पर्सनल लॉ अधिनियम १९३७ मधील तरतुदींची पडताळणी करण्याचं काम सोपवण्यात आलं होतं.  

टॅग्स :marriageलग्नAssamआसाम