शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पावसाचा हाहाकार! आसाममध्ये वीज कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू; 21 हजार लोकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 15:00 IST

Assam Rain News : गेल्या दोन दिवसांत राज्यात किमान 7,378 घरे आणि इतर आस्थापनांचे नुकसान झाले आहे.

नवी दिल्ली - आसाममध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. वीज पडून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. भीषण परिस्थिती निर्माण झाली असून मोठं नुकसान झालं आहे. जवळपास 21 हजार लोकांना पावसाचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, आसामच्या अनेक भागात 'बोरदोइसिला' ने कहर केला आहे. उन्हाळ्यात येणारे वादळ आणि पाणी याला आसाममध्ये 'बोरदोइसिला' म्हणतात. यात जीवितहानी व्यतिरिक्त घरांचं नुकसान झालं आहे. झाडं उन्मळून पडली आहेत आणि तुटलेल्या वीजवाहिन्यांचा समावेश आहे.

गेल्या दोन दिवसांत राज्यात किमान 7,378 घरे आणि इतर आस्थापनांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस आणि वादळ यामुळे तब्बल 21 हजारांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. शुक्रवारी डिब्रुगडमध्ये झालेल्या भीषण वादळामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत वादळामुळे राज्याच्या विविध भागात शेकडो झाडे आणि विद्युत खांब पडले. विविध ठिकाणी अनेक घरांचे नुकसान झालं. गोलपारा, बारपेटा, डिब्रुगडमध्ये घरांचं मोठं नुकसान झालं आहे. 

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पाऊस किंवा विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. IMD ने सांगितले की, पुढील पाच दिवसांत भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये वादळ, पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार गडगडाट होण्याची शक्यता आहे. याशिवाय 18 एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम भारतातील हवामानावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी मेघालयच्या री-भोई जिल्ह्यात एका चक्रीवादळामुळे 1000 हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बीडीओ कार्यालय, शाळा, पशुसंवर्धन कार्यालय तसेच परिसरातील अनेक इमारतींना त्याचा फटका बसला आहे. तसेच 5 एप्रिल रोजी पावसामुळे झालेल्या भूस्खलनात राज्यातील दोन जणांनी जीव गमवावा लागला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :AssamआसामRainपाऊस