शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पावसाचा हाहाकार! आसाममध्ये वीज कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू; 21 हजार लोकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 15:00 IST

Assam Rain News : गेल्या दोन दिवसांत राज्यात किमान 7,378 घरे आणि इतर आस्थापनांचे नुकसान झाले आहे.

नवी दिल्ली - आसाममध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. वीज पडून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. भीषण परिस्थिती निर्माण झाली असून मोठं नुकसान झालं आहे. जवळपास 21 हजार लोकांना पावसाचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, आसामच्या अनेक भागात 'बोरदोइसिला' ने कहर केला आहे. उन्हाळ्यात येणारे वादळ आणि पाणी याला आसाममध्ये 'बोरदोइसिला' म्हणतात. यात जीवितहानी व्यतिरिक्त घरांचं नुकसान झालं आहे. झाडं उन्मळून पडली आहेत आणि तुटलेल्या वीजवाहिन्यांचा समावेश आहे.

गेल्या दोन दिवसांत राज्यात किमान 7,378 घरे आणि इतर आस्थापनांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस आणि वादळ यामुळे तब्बल 21 हजारांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. शुक्रवारी डिब्रुगडमध्ये झालेल्या भीषण वादळामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत वादळामुळे राज्याच्या विविध भागात शेकडो झाडे आणि विद्युत खांब पडले. विविध ठिकाणी अनेक घरांचे नुकसान झालं. गोलपारा, बारपेटा, डिब्रुगडमध्ये घरांचं मोठं नुकसान झालं आहे. 

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पाऊस किंवा विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. IMD ने सांगितले की, पुढील पाच दिवसांत भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये वादळ, पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार गडगडाट होण्याची शक्यता आहे. याशिवाय 18 एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम भारतातील हवामानावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी मेघालयच्या री-भोई जिल्ह्यात एका चक्रीवादळामुळे 1000 हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बीडीओ कार्यालय, शाळा, पशुसंवर्धन कार्यालय तसेच परिसरातील अनेक इमारतींना त्याचा फटका बसला आहे. तसेच 5 एप्रिल रोजी पावसामुळे झालेल्या भूस्खलनात राज्यातील दोन जणांनी जीव गमवावा लागला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :AssamआसामRainपाऊस