शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Assam Rain : हाहाकार! आसामला पावसाचा तडाखा, मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पुरामुळे परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 10:45 IST

Assam Rain : पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - आसामला पावसाचा तडाखा बसला आहे. राजधानी गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पावसामुळे बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. मात्र, बुधवारी पावसामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे. बोरगाव येथे मंगळवारी दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याचाही यात समावेश आहे. 

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, गीतानगर, सोनापूर, कालापहार आणि निजारापार भागात भूस्खलनामुळे ढिगारा साचल्याने रस्ते बंद झाले आहेत. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते जलमय झाले आहेत. अनिल नगर, नवीन नगर, राजगड लिंक रोड, रुक्मिणीगाव, हाटीगाव आणि कृष्णा नगर या भागांना सर्वाधिक फटका बसला आहे. या भागात NDRF आणि SDRF कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

जनजीवन विस्कळीत

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटींचा वापर केला जात आहे. पुरात अडकलेल्या लोकांची सुटका आणि त्यांना मदत साहित्य पुरवण्याचं काम सुरू आहे. आसाम वीज वितरण कंपनी लिमिटेड (APDCL) मंगळवारपासून वीज नसलेल्या शहरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी चोवीस तास काम करत आहे. पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवण्यात आले आहेत. अत्यावश्यक गरज असेल तेव्हाच लोकांनी घराबाहेर पडावे, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

अतिवृष्टीचा इशारा

कामरूप महानगर उपायुक्त पल्लव गोपाल झा यांनी सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) जारी केलेल्या पावसाचा इशारा लक्षात घेऊन वर्ग बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आसाममध्ये 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे आसाममध्ये पूर आला होता. आता मान्सूनच्या आगमनानंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसामRainपाऊस