शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आसामची NRC यादी वेबसाइटवरून गायब?, गृह मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 14:12 IST

आसाममध्ये गेल्यावर्षी एनआरसीची प्रक्रिया झाली होती.

नवी दिल्ली : सीएए आणि एनआरसी या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. यातच आता आसाम एनआरसीच्या डेटा संदर्भात वाद सुरू झाला आहे.

आसाममध्ये गेल्यावर्षी एनआरसीची प्रक्रिया झाली होती. त्याचा सर्व डेटा अधिकृत वेबसाइटवरून गायब झाला आहे. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, यावर आता गृह मंत्रालयाने उत्तर दिले आहे. एनआरसी संबंधित डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे डेटा वेबसाईटवर दिसत नाही, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी आसाम एनआरसीचा डेटा गृह मंत्रालयाद्वारे http://www.nrcassam.nic.in या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला होता. यामध्ये संपूर्ण यादी होती. मात्र, अचानक हा डेटा हटविण्यात आला आणि वेबसाइट सुद्धा सुरू होत नव्हती. यानंतर, अनेक अफवा पसरू लागल्या आणि यासंदर्भात गृह मंत्रालयाकडे प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व अफवा दूर करत एनआरसीचा सर्व डेटा सुरक्षित असल्याचे सांगितले. तसेच, वेबसाईटवर क्लाउडच्या कारणास्तव डेडा दिसू शकत नाही. हा बिघाड लवकरच दुरुस्त करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

एनआरसीचे राज्य कॉर्डिनेटर (समन्वयक) हितेश देव शर्मा यांनी यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, "सध्या डेटा ऑफ लाइन करण्यात आला आहे. मात्र, ही चूक तांत्रिक कारणामुळे झाली आहे. वेबसाईटच्या क्लाउड सर्व्हिसची जबाबदारी आयटी फर्म विप्रोकडे देण्यात आली होती. पण, ती ऑक्टोबर 2019 पर्यंत उपलब्ध होती. 

याचबरोबर, हितेश देव शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील कॉर्डिनेटरने यंत्रणा अपडेट केली नव्हती. त्यामुळे 15 डिसेंबर रोजी विप्रो कंपनीने ही सुविधा बंद केली. दरम्यान, राज्य समन्वय समितीने आता यावर काम करण्यास सुरुवात केली असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विप्रो कंपनीला यासंदर्भात अधिकृत सूचना देण्यात आली आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत वेबसाईटवर हा सर्व डेटा दिसून येईल. 

दरम्यान, आसाममध्ये गेल्या वर्षी एनआरसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. ज्यामध्ये 19 लाख लोक यादीतून बाहेर झाले होते. 31 ऑगस्ट 2019 रोजी सरकारकडून एनआरसीची अंतिम यादी जाहीर करण्यात आली होती. ज्यामध्ये आसाममधील एकूण 3,30,27,661 लोकांपैकी 3,11,21004 नागरिकांची नावे आली होती. तर 19,06,657 लोक एनआरसीच्या यादीतून बाहेर झाले होते. 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयNational Register of CitizensएनआरसीAssamआसाम