शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आसाममध्ये महापूर! 444 गावे पाण्यात, IMD चा 5 दिवस 'रेड अलर्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 13:38 IST

Assam Flood: पावसामुळे आसाममधील 10 जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.

Assam Flood Situation: मुसळधार पाऊस आणि पुरामुळे ईशान्येकडील आसाम राज्याला मोठा फटका बसला आहे. पुरामुळे राज्यातील अनेक भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आसाममधील 10 जिल्ह्यांतील सुमारे 31,000 लोकांना अजूनही पाण्याखालील भागात राहावे लागत आहे. मंगळवारी पूरस्थिती गंभीर झाली असून प्रशासकीय स्तरावरही मदत व बचावकार्य सुरू आहे. 

भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात 'रेड अलर्ट' जारी केला आहे. पुढील 5 दिवस आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जवळपास 15 जिल्हे पुराच्या विळख्यात आले असून, 80 हजारांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. राज्यातील चिरांग, दारंग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगड, कोक्राझार, लखीमपूर, नलबारी, सोनितपूर आणि उदलगुरी जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका बसला आहे. 

राज्याच्या हवामान खात्याने सांगितले की, सध्या राज्यातील 444 गावे पाण्याखाली आली आहेत. तसेच, पुरामुळे 4,741.23 हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये मातीची धूपही मोठ्या प्रमाणात झाली आहे. मुसळधार पावसामुळे दिमा हासाओ, कामरूप महानगर आणि करीमगंजमध्ये काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसामRainपाऊस