शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

आसाममध्ये महापूर! 444 गावे पाण्यात, IMD चा 5 दिवस 'रेड अलर्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 13:38 IST

Assam Flood: पावसामुळे आसाममधील 10 जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.

Assam Flood Situation: मुसळधार पाऊस आणि पुरामुळे ईशान्येकडील आसाम राज्याला मोठा फटका बसला आहे. पुरामुळे राज्यातील अनेक भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आसाममधील 10 जिल्ह्यांतील सुमारे 31,000 लोकांना अजूनही पाण्याखालील भागात राहावे लागत आहे. मंगळवारी पूरस्थिती गंभीर झाली असून प्रशासकीय स्तरावरही मदत व बचावकार्य सुरू आहे. 

भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात 'रेड अलर्ट' जारी केला आहे. पुढील 5 दिवस आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जवळपास 15 जिल्हे पुराच्या विळख्यात आले असून, 80 हजारांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. राज्यातील चिरांग, दारंग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगड, कोक्राझार, लखीमपूर, नलबारी, सोनितपूर आणि उदलगुरी जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका बसला आहे. 

राज्याच्या हवामान खात्याने सांगितले की, सध्या राज्यातील 444 गावे पाण्याखाली आली आहेत. तसेच, पुरामुळे 4,741.23 हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये मातीची धूपही मोठ्या प्रमाणात झाली आहे. मुसळधार पावसामुळे दिमा हासाओ, कामरूप महानगर आणि करीमगंजमध्ये काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसामRainपाऊस