शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

१०४ वर्षीय चंद्रधर दास यांचं निधन; “भारताचं नागरिकत्व मिळावं ही शेवटची इच्छा होती, पण...”

By प्रविण मरगळे | Published: December 15, 2020 12:48 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चंद्रधर दास यांना खूप अपेक्षा होत्या. कायदा बनून एक वर्ष झाला तरी अद्याप ज्यांना देव मानत होते त्या मोदींनी काय केले?

ठळक मुद्देचंद्रधर यांना नेहमी अपेक्षा होती की, एक दिवस त्यांना भारताचं नागरिकत्व मिळेलते जिथे कुठे नरेंद्र मोदींचा फोटो असेल तिथे हात जोडून नमस्कार करत होतेभारताचं नागरिकत्व घेऊन जीवन संपवण्याचं त्यांची अखेरची इच्छा होती. मात्र नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होण्यास उशीर झाला

गुवाहाटी – आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाला, तेव्हापासून स्वत:वरील परदेशी असल्याचा ठपका हटवण्यासाठी आस लावून बसलेले १०४ वर्षीय चंद्रधर दास यांचे रविवारी निधन झालं. २ वर्षापूर्वी त्यांना परदेशी नागरिकांसाठी बनवण्यात आलेल्या कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याठिकाणी ३ महिने घालवल्यानंतर दास यांना जामीन मिळाला होता, मागील काही दिवसांपासून ह्दयाच्या आजाराने ग्रस्त असलेले दास यांनी परदेशी म्हणूनच दम तोडला.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार दास यांची मुलगी न्युती यांना ते दिवस आठवतात, जेव्हा चंद्रधर दास हे मोबाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकत होते, पंतप्रधानांचे भाषण ऐकून हसत ते म्हणाले, नरेंद्र मोदी देव आहेत, नागरिकत्व सुधारणा कायद्याने ते समस्येवर तोडगा काढतील, आपण सगळे भारतीय होऊ, चंद्रधर यांना नेहमी अपेक्षा होती की, एक दिवस त्यांना भारताचं नागरिकत्व मिळेल, ते जिथे कुठे नरेंद्र मोदींचा फोटो असेल तिथे हात जोडून नमस्कार करत होते असं न्युतीने सांगितले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चंद्रधर दास यांना खूप अपेक्षा होत्या. कायदा बनून एक वर्ष झाला तरी अद्याप ज्यांना देव मानत होते त्या मोदींनी काय केले? चंद्रधर यांना फक्त भारतीय म्हणून मरायचं होतं, आम्ही खूप प्रयत्न केले, कोर्टाच्या पायऱ्या चढल्या, वकिलांपासून सामाजिक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. सर्व कागदपत्रे जमा केली आणि आता चंद्रधर दास जग सोडून गेले, आम्ही आताही कायद्याच्या दृष्टीने परदेशी आहोत. नागरिकत्व सुधारणा कायद्याने आमच्यासाठी काहीच केले नाही अशी खंत दास यांची मुलगी न्युतीने व्यक्त केलं.

काय आहे चंद्रधर दास यांची कहाणी?

चंद्रधर दास यांचा मुलगा गौरांगने सांगितले की, ते पूर्व पाकिस्तानमधून भारतात आले होते, त्याठिकाणी खूप हत्या होत होत्या, त्यासाठी सीमा ओलांडून भारताच्या त्रिपुरामध्ये त्यांनी प्रवेश केला, याठिकाणी जवळपास ५०-६० दशकं वास्तव्य केले. त्रिपुरावरून दास यांनी संघर्ष करत आसाम गाठलं, उदरनिर्वाहासाठी ते लाडू विकत होते. त्यानंतर एकेदिवशी २०१८ मध्ये काही अधिकाऱ्यांनी दास यांना घरातून उचलून नेलं आणि परदेशी लोकांसाठी बनवण्यात आलेल्या डिटेंशन कॅम्पमध्ये ठेवलं.

जून २०१८ मध्ये दास यांना जामीन मिळाला परंतु त्यांच्या कुटुंबाचे हे प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट आहे. आयुष्याच्या अखेरच्या काळात दास यांना डिमेंशियाचा आजार झाला होता. ते खात-पित होते, झोपत होते, परंतु बोलणं कमी झालं होतं. जेव्हा ते बोलत होते तेव्हा खटल्याबद्दल विचारायचे. या समस्येवर मोदी लवकर तोडगा काढतील असा विश्वास चंद्रधर दास यांना होता. अजूनही खटल्याचा निकाल लागला नाही हे सांगण्याची हिंमत आमच्यात नव्हती. भारताचं नागरिकत्व घेऊन जीवन संपवण्याचं त्यांची अखेरची इच्छा होती. मात्र नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होण्यास उशीर झाला आणि शेवटी परदेशी म्हणूनच चंद्रधर दास यांना जगाचा निरोप घ्यावा लागला.

दरम्यान, चंद्रधर यांच्या मृत्युनंतर राजकीय वातावरण पेटलं आहे. काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी दास यांच्या कुटुंबाची भेट घेत नागरिकत्व सुधारणा कायदा फक्त मतांचे राजकारण करण्यासाठी आणलं होतं, तसेच डिटेंशन कॅम्पमध्ये असणाऱ्या लोकांना भाजपा मदत करत नाही असा आरोप त्यांनी केला तर भाजपा खासदार राजदीप राय यांनी दास यांच्या निधनावर शोक व्यक्त करत जे घडलं ते दुर्दैवी आहे. कोरोना महामारीमुळे नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याच्या प्रक्रियेत विलंब झाला असं त्यांनी सांगितले.  

 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान