शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Himanta Biswa Sarma: “उद्धव ठाकरेंकडून पक्ष आणि पक्षचिन्ह का गेले?”; आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिला अजब तर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 18:06 IST

Himanta Biswa Sarma: केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत हेमंत बिस्वा सरमा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Politics:उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असताना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. यानंतर यासंदर्भात राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. यातच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर अजब तर्क दिला आहे. 

गुवाहाटीतील भीमाशंकर धाम ज्योतिर्लिंग मंदिर यात्रा सुरू आहे.  भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचे स्थान हे शिव पुराणानुसार कामरूप प्रदेशात आहे. आसाम सरकारने यासंदर्भातील एक जाहिरात दिली होती, ज्यावरून महाराष्ट्र आणि आसाम या राज्यांमध्ये वाद झाला. जो वाद झाला त्या वादाची काही गरज नव्हती. भगवान शंकर भारतातील प्रत्येक भागांमध्ये आहेत. भारतीय सनातनी संस्कृतीची ताकद भागात पोहोचली आहे. भीमाशंकर मंदिर या ठिकाणी हजारो वर्षापासून आहे, असे हेमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे पक्ष आणि पक्षचिन्हाची लढाई का हरले, यावर प्रतिक्रिया दिली. 

उद्धव ठाकरेंकडून पक्ष आणि पक्षचिन्ह का गेले?

देवावर राजकारण केल्याने उद्धव ठाकरे हे पक्ष आणि चिन्हाची लढाई हरले आहेत. त्यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गमवावे लागले आहे. खरेतर भगवान शंकराचे सहावे ज्योतिर्लिंग अशी ख्याती असलेले भीमाशंकर कुठे आहे यावरुन दोन राज्यांमध्ये वाद आहे. भगवान शंकराचे वास्तव्य हिमालयात असते. त्यांना कुठल्याही विशेष स्थानापर्यंत सीमित करता येणार नाही. महाराष्ट्रात विरोधी पक्ष शंकराच्या नावावर राजकारण करतो आहे. याच कारणामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हिरावले गेले आहे, असा अजब तर्क हेमंत बिस्वा सरमा यांनी मांडला. 

दरम्यान, धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नाव मिळवण्यासाठी २ हजार कोटीचा व्यवहार झाला. त्याचे पुरावे लवकरच येतील. खात्रीने सांगतो ही डील झाली. हा सौदा आहे. जो पक्ष नगरसेवक आणि शाखाप्रमुखांना विकत घेण्यासाठी ५० लाख देतोय, आमदारांना विकत घेण्यासाठी ५० कोटी आणि खासदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी देतात तो पक्ष शिवसेना हे नाव घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल याचा हिशोब लागणार नाही. हा न्याय नाही. हे डील आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :AssamआसामShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे