शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

"एरव्ही ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या मोदींनी आसाम महापुरावर एक चकार शब्द काढला नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 19:27 IST

Assam Assembly Election 2021: भारतीय जनता पक्ष (BJP) सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात असून, अनेक नेते, मंत्री आसाममध्ये प्रचारसभांमध्ये गुंतल्याचे दिसत आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीकाजोरहाट येथील सभेत प्रियांका गांधींचा निशाणाविकासाचे मुद्दे सोडून दिशा रवी टूलकिटची मोदींना चिंता - गांधी

गुवाहाटी: आसाम विधानसभा निवडणुकांच्या (Assam Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी जोर धरू लागल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात असून, अनेक नेते, मंत्री आसाममध्ये प्रचारसभांमध्ये गुंतल्याचे दिसत आहेत. अशातच आता काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनीही प्रचारात सक्रीय झाल्या आहेत. जोरहाट येथील सभेला प्रियांका गांधी यांनी संबोधित करत केंद्र सरकार आणि पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. (assam assembly election 2021 congress leader priyanka gandhi criticised pm narendra modi on various issues)

एरव्ही ट्विटवर सक्रीय असलेले पंतप्रधान मोदी आसाम महापुरावर काहीही बोलले नाहीत. काल त्यांचे भाषण ऐकत होते. मला वाटले की, ते आसामच्या विकासाबाबत बोलतील. आसाममधील भाजपच्या आराखड्याविषयी बोलतील. मात्र, बाकी सगळं सोडून २२ वर्षीय दिशा रवी हिच्या टूलकिटबाबत बोलले, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली. 

राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास

चहा उद्योग संपुष्टात आणण्याचा डाव

आसाममधील चहा उद्योग संपुष्टात आणण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. मात्र, आसाममधील महापूर, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात पाच युवकांचा झालेला मृत्यू यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी एक चकार शब्द काढला नाही, अशी विचारणा प्रियांका गांधी यांनी केली आहे. भाजपकडून आश्वासन देण्यात आलेले २५ लाख रोजगार मिळाले का, सीएए लागू करणार नाही, असे म्हणणाऱ्या भाजपने सत्तेत येताच सीएए लागू केला, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. 

दरम्यान, आसाम विधानसभेच्या १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. २७ मार्च रोजी पहिला टप्पा, ०१ एप्रिल रोजी दुसरा टप्पा आणि ०६ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. तर, मतमोजणी ०२ मे रोजी होणार आहे. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Priyanka Gandhiप्रियंका गांधीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण