शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष; योजनांचे लाभ घेण्यासाठी भाजपला मत द्या: स्मृति इराणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 5:13 PM

केंद्रीय मंत्री स्मृति इराणी (smriti irani) यांनीही आसाममधील एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत भाजपला मत देण्याचा आवाहन केले.

ठळक मुद्देस्मृति इराणी यांचा काँग्रेसवर हल्लाबोलयोजनांचे लाभ घेण्यासाठी भाजपला मत देण्याचे आवाहनकाँग्रेसने गरिबांसाठी कधीही काम केले नसल्याचा केला आरोप

मारियानी : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. पाचही राज्यांमध्ये अधिकाधिक यश मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) कंबर कसली आहे. आसाम विधानसभा निवडणुकीसाठीही प्रचाराला वेग आला असून, भाजपचे अनेक नेते आता आसाममध्ये जाऊ लागले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृति इराणी (smriti irani) यांनीही आसाममधील एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत भाजपला मत देण्याचा आवाहन केले. (assam assembly election 2021 bjp leader smriti irani blamed that congress is most corrupt party)

आसाममधील एका सभेला संबोधित करताना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे. केंद्रातील आणि राज्यातील कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर भारतीय जनता पक्षालाच मत द्या, असे आवाहन स्मृति इराणी यांनी यावेळी बोलताना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अशा अनेक योजना तयार केल्या आहेत, ज्याचा राज्यातील जनतेला पूरेपूर लाभ घेता येईल, असेही त्या म्हणाल्या.

जीवन क्षणभंगुर आहे; कोरोना लसीबाबत सद्गुरुंनी दिला 'हा' मोलाचा सल्ला

काँग्रेसने गरिबांसाठी कधीही काम केले नाही

केवळ भाजप असा पक्ष आहे, जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो, काम करत असतो. काँग्रेसने कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तो सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे, अशी टीका स्मृति इराणी यांनी केली आहे. आसाममधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करा, असे त्यांनी सांगितले. आसाममध्ये अनेक बडे काँग्रेस नेते होऊन गेले. त्यातील पंतप्रधानही झाले. मात्र, राज्याचा विकास, गरिबांचे कल्याण झाले नाही. केवळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात आसाममध्ये एम्स उभे राहिले, असे इराणी यांनी नमूद केले. 

काँग्रेसने अजमलसोबत हातमिळवणी केली

काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने बदरुद्दीन अजमल यांच्या पक्षाशी युती करण्यापासून पक्षाला रोखले होते. मात्र, त्या ज्येष्ठ नेत्याचे निधन झाल्यावर लगेचच काँग्रेसने अजमल यांच्या पक्षाशी युती केली, असा आरोप इराणी यांनी केल्या. आसाम विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी दिलेल्या रमानी तंती यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत स्मृति इराणी बोलत होत्या. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाPoliticsराजकारण