शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष; योजनांचे लाभ घेण्यासाठी भाजपला मत द्या: स्मृति इराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 17:15 IST

केंद्रीय मंत्री स्मृति इराणी (smriti irani) यांनीही आसाममधील एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत भाजपला मत देण्याचा आवाहन केले.

ठळक मुद्देस्मृति इराणी यांचा काँग्रेसवर हल्लाबोलयोजनांचे लाभ घेण्यासाठी भाजपला मत देण्याचे आवाहनकाँग्रेसने गरिबांसाठी कधीही काम केले नसल्याचा केला आरोप

मारियानी : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. पाचही राज्यांमध्ये अधिकाधिक यश मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) कंबर कसली आहे. आसाम विधानसभा निवडणुकीसाठीही प्रचाराला वेग आला असून, भाजपचे अनेक नेते आता आसाममध्ये जाऊ लागले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृति इराणी (smriti irani) यांनीही आसाममधील एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत भाजपला मत देण्याचा आवाहन केले. (assam assembly election 2021 bjp leader smriti irani blamed that congress is most corrupt party)

आसाममधील एका सभेला संबोधित करताना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे. केंद्रातील आणि राज्यातील कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर भारतीय जनता पक्षालाच मत द्या, असे आवाहन स्मृति इराणी यांनी यावेळी बोलताना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अशा अनेक योजना तयार केल्या आहेत, ज्याचा राज्यातील जनतेला पूरेपूर लाभ घेता येईल, असेही त्या म्हणाल्या.

जीवन क्षणभंगुर आहे; कोरोना लसीबाबत सद्गुरुंनी दिला 'हा' मोलाचा सल्ला

काँग्रेसने गरिबांसाठी कधीही काम केले नाही

केवळ भाजप असा पक्ष आहे, जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो, काम करत असतो. काँग्रेसने कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तो सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे, अशी टीका स्मृति इराणी यांनी केली आहे. आसाममधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करा, असे त्यांनी सांगितले. आसाममध्ये अनेक बडे काँग्रेस नेते होऊन गेले. त्यातील पंतप्रधानही झाले. मात्र, राज्याचा विकास, गरिबांचे कल्याण झाले नाही. केवळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात आसाममध्ये एम्स उभे राहिले, असे इराणी यांनी नमूद केले. 

काँग्रेसने अजमलसोबत हातमिळवणी केली

काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने बदरुद्दीन अजमल यांच्या पक्षाशी युती करण्यापासून पक्षाला रोखले होते. मात्र, त्या ज्येष्ठ नेत्याचे निधन झाल्यावर लगेचच काँग्रेसने अजमल यांच्या पक्षाशी युती केली, असा आरोप इराणी यांनी केल्या. आसाम विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी दिलेल्या रमानी तंती यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत स्मृति इराणी बोलत होत्या. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाPoliticsराजकारण