मोदी यांच्या झंझावाताने ईशान्य भारतातही घुसत आसामात गेल्या तीन निवडणुकांत सत्तेवर आलेल्या कॉँग्रेसची झोप उडवली. तेथे १४ पैकी ७ जागांवर भाजपाने विजय संपादन केला. कॉँग्रेसला अवघ्या तीन, एआययूडीफला तीन व एक अपक्षाला प्राप्त झाली. ईशान्येतील इतर छोट्या राज्यांमध्ये पूर्वीपासून कॉँग्रेसचा प्रभाव राहिला असला तरी तेथील दुर्गम राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य राहिले आहे. अरुणाचलमध्ये एक कॉँग्रेसला व एक भाजपाला मिळविता आली. मेघालयमध्ये शिलॉँगची जागा कॉँग्रेस व तुरा ही जागा पूर्णो संगमांच्या नेतृत्वाखाली नॅशनल पीपल्स पार्टीने राखली. नागालॅँडची एक जागा भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या एनसीएफने राखली. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये इनर मणिपूरची कॉँग्रेसला व आउटर मणिपूरची जागा नागा पीपल्स फ्रंटला प्राप्त झाली. मिझोराममध्ये एकमेव जागा कॉँग्रेसने राखली.
मोदींच्या लाटेत आसामही सामील
By admin | Updated: May 17, 2014 04:33 IST