शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

"रंग बदलणारा सरडा, भाजपात प्रवेश करू शकतो"; 'तो' Video शेअर करत कन्हैया कुमारवर जोरदार हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 14:53 IST

Kanhaiya Kumar And Ashoke Pandit : चित्रपट निर्मात्याने कन्हैया कुमारची तुलना थेट सरड्याशी केली आहे. "सरड्याचे बदलते रंग" म्हणत निशाणा साधला आहे. 

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमारने (Kanhaiya Kumar) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केसी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. कन्हैया कुमारने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा एका जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कन्हैया कुमार काँग्रेस पक्षावर खूप टीका करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत चित्रपट निर्मात्याने कन्हैया कुमारची तुलना थेट सरड्याशी केली आहे. "सरड्याचे बदलते रंग" म्हणत निशाणा साधला आहे. 

कन्हैया कुमारने जुन्या व्हिडिओमध्ये भारताचा विनाश करण्यासाठी एकटी काँग्रेस पुरेशी होती असं म्हटलं होतं. तर दुसरीकडे आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने "जर काँग्रेस वाचली नाही तर देशही वाचणार नाही" असं म्हटलं आहे. कन्हैया कुमारचा हा व्हिडीओ ट्विटरला शेअर करताना चित्रपट निर्माते अशोक पंडित (Ashoke Pandit) यांनी ‘सरड्याचे बदलते रंग’ असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "राहुल गांधी जेव्हा बाहेर काढतील तेव्हा हा भाजपात प्रवेश करू शकतो. आश्चर्य वाटू देऊ नका" असं कन्हैया कुमारवर टीका करताना अशोक पंडित यांनी म्हटलं आहे. 

अशोक पंडित यांच्या ट्विटवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. सतीश कुमार नावाच्या एका युजरने "तुम्हाल लाज वाटली पाहिजे. राज्य आणि देशाच तुमचं सरकार असूनदेखील ही व्यक्ती जेलमध्ये नाही. का आपल्या अपयशाचे ढोल वाजवत जगाला सांगत आहात" असं म्हटलं आहे. तर रोहित सिंह नावाच्या एका युजरने अशोक पंडित यांच्या ट्विटवर कमेंट करत म्हटलं आहे की "भाजपातून गेल्यावर काँग्रेस आणि काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर भाजपात जातात. दोघांनी मिळून एकच पक्ष तयार करावा हे बरं होईल." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

'काँग्रेस वाचली नाही, तर देशही वाचणार नाही'

कन्हैया कुमारने, आपण काँग्रेसमध्ये का सामील झालो हे सांगितले. कन्हैया म्हणाला, मला वाटते, की या देशात काही लोक, ते केवळ लोक नाही, तर एक विचार आहे. या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कुठे तरी वाचले होते, की तुम्ही सर्वप्रथन तुमच्या शत्रूची निवड करा. मित्र, अपोआप तयार होतील. तर मी निवड केली आहे. लोकशाही पक्षात आम्ही यामुळे सामील होत आहोत, कारण जर काँग्रेस वाचली नाही, तर देशही वाचणार नाही, असे आता वाटू लागले आहे. कन्हैया म्हणाला, जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत. 

 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण