शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

"रंग बदलणारा सरडा, भाजपात प्रवेश करू शकतो"; 'तो' Video शेअर करत कन्हैया कुमारवर जोरदार हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 14:53 IST

Kanhaiya Kumar And Ashoke Pandit : चित्रपट निर्मात्याने कन्हैया कुमारची तुलना थेट सरड्याशी केली आहे. "सरड्याचे बदलते रंग" म्हणत निशाणा साधला आहे. 

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमारने (Kanhaiya Kumar) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केसी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. कन्हैया कुमारने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा एका जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कन्हैया कुमार काँग्रेस पक्षावर खूप टीका करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत चित्रपट निर्मात्याने कन्हैया कुमारची तुलना थेट सरड्याशी केली आहे. "सरड्याचे बदलते रंग" म्हणत निशाणा साधला आहे. 

कन्हैया कुमारने जुन्या व्हिडिओमध्ये भारताचा विनाश करण्यासाठी एकटी काँग्रेस पुरेशी होती असं म्हटलं होतं. तर दुसरीकडे आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने "जर काँग्रेस वाचली नाही तर देशही वाचणार नाही" असं म्हटलं आहे. कन्हैया कुमारचा हा व्हिडीओ ट्विटरला शेअर करताना चित्रपट निर्माते अशोक पंडित (Ashoke Pandit) यांनी ‘सरड्याचे बदलते रंग’ असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "राहुल गांधी जेव्हा बाहेर काढतील तेव्हा हा भाजपात प्रवेश करू शकतो. आश्चर्य वाटू देऊ नका" असं कन्हैया कुमारवर टीका करताना अशोक पंडित यांनी म्हटलं आहे. 

अशोक पंडित यांच्या ट्विटवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. सतीश कुमार नावाच्या एका युजरने "तुम्हाल लाज वाटली पाहिजे. राज्य आणि देशाच तुमचं सरकार असूनदेखील ही व्यक्ती जेलमध्ये नाही. का आपल्या अपयशाचे ढोल वाजवत जगाला सांगत आहात" असं म्हटलं आहे. तर रोहित सिंह नावाच्या एका युजरने अशोक पंडित यांच्या ट्विटवर कमेंट करत म्हटलं आहे की "भाजपातून गेल्यावर काँग्रेस आणि काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर भाजपात जातात. दोघांनी मिळून एकच पक्ष तयार करावा हे बरं होईल." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

'काँग्रेस वाचली नाही, तर देशही वाचणार नाही'

कन्हैया कुमारने, आपण काँग्रेसमध्ये का सामील झालो हे सांगितले. कन्हैया म्हणाला, मला वाटते, की या देशात काही लोक, ते केवळ लोक नाही, तर एक विचार आहे. या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कुठे तरी वाचले होते, की तुम्ही सर्वप्रथन तुमच्या शत्रूची निवड करा. मित्र, अपोआप तयार होतील. तर मी निवड केली आहे. लोकशाही पक्षात आम्ही यामुळे सामील होत आहोत, कारण जर काँग्रेस वाचली नाही, तर देशही वाचणार नाही, असे आता वाटू लागले आहे. कन्हैया म्हणाला, जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत. 

 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण