शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 12:15 IST

Lok Sabha Elections 2024 And Ashok Gehlot : भाजपा सातत्याने राहुल गांधींना स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवायची नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.आता या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी दिले आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील अमेठी या जागेची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा बालेकिल्ला मानली जाणारी ही जागा आता भाजपाकडे आहे आणि स्मृती इराणी येथून खासदार आहेत. त्याचवेळी, यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठीतून पुन्हा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र काँग्रेस हायकमांडने स्मृती इराणी यांच्या विरोधात केएल शर्मा यांना उमेदवार म्हणून घोषित केलं आणि राहुल गांधी यांच्यासाठी रायबरेलीची जागा निवडण्यात आली. तेव्हापासून भाजपा सातत्याने विरोधी पक्षावर हल्लाबोल करत आहे राहुल गांधींना स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवायची नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आता या प्रश्नाचे उत्तर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी दिले आहे. "केएल शर्मा हे 40 वर्षांपासून काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. राहुल गांधींनी अमेठीला का जावे, ज्याची गरज नाही... हा पक्षाचा निर्णय आहे. कारण तिथे फक्त केएल शर्माच त्यांच्याशी (भाजपा) सामना करू शकतात. गांधी परिवाराच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस काम करणाऱ्या व्यक्तीने उमेदवार व्हावं यापेक्षा चांगलं काय असू शकतं."

"राहुल गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्छा आहे. ते रायबरेलीच्या जागेवरूनही विजयी होतील. इथे (अमेठीत) फक्त केएल शर्माच विरोधकांशी सामना करतील. जनताच म्हणत आहे की त्यांना असा कार्यकर्ता मिळाला जो त्यांचं ऐकतो, आवाज उठवतो आणि त्यांच्यासाठी काम करतो, आजपर्यंत जनतेचे मत दिल्लीत पोहोचले नाही, परंतु केएल शर्मा सक्रिय झाल्यानंतर लोकांचं ऐकले जात आहे" असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. 

केएल शर्मा यांच्याबाबत अशोक गेहलोत म्हणाले की, "ते आधीपासून काम करत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते सक्रिय आहेत आणि सोनिया गांधी यांनाही त्यांचे काम माहीत आहे. कोणीही निवडणूक लढवली असेल, मग ते सतीश शर्मा असोत, राहुल गांधी असोत की सोनिया गांधी असोत, प्रत्येकाला केएल शर्मा यांचे काम पाहिले आहे आणि मला माहित आहे की अमेठीच्या लोकांच्या समस्या देखील जाणून आहेत, त्यांच्याकडे लोकांसाठी प्लॅन आहे." 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणीcongressकाँग्रेस