शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:52 IST

सरकार तरले : भाजपचा डाव हाणून पाडला -काँग्रेस

जयपूर : अतिशय नाराज झालेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी अखेर पक्षामध्येच राहाण्याचा निर्णय घेतल्याने राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार यापुढेही टिकणार हे स्पष्ट झाले होते. त्या गोष्टीवर राजस्थानच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकून अशोक गेहलोत सरकारने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.२०० सदस्यसंख्या असलेल्या राजस्थान विधानसभेत काँग्रेस पक्षाचे १०७ आमदार असून या पक्षाच्या सरकारला मित्र पक्ष व अपक्षांचा पाठिंबा आहे. तर भाजपचे ७२ आमदार आहेत. सचिन पायलट यांचे समर्थक असलेले १९ काँग्रेस आमदार पुन्हा आपल्या नेत्यासह पुन्हा पक्षाच्या छावणीत परतल्याने गेहलोत निश्चिंत झाले होते. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले होते.लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारांना अस्थिर करण्याऱ्यांना आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकून धडा शिकविला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली आहे. ते म्हणाले की, भाजपने मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश या राज्यांत खूप कारस्थाने केली. तोच प्रयोग त्यांना राजस्थानमध्ये करून माझे सरकार उलथवायचे होते. पण त्या पक्षाचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला आहे.तर सचिन पायलट यांनी सांगितले की, विरोधकांनी उभे केलेले अनेक अडथळे पार करून अशोक गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यातून सर्वांचा काँग्रेस पक्षावर व राज्य सरकारवर असलेला विश्वासही प्रकट झाला आहे. आम्ही उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न सुरू झाले आहेत असेही पायलट म्हणाले. सचिन पायलट समर्थक १९ आमदार पक्षातून फुटल्यास गेहलोत सरकारला धोका निर्माण झाला असता.मतभेद न ताणण्याचा दाखविला शहाणपणाविश्वासदर्शक ठरावावर मतदानाच्या आदल्या दिवशी गुरुवारी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची गुरुवारी बैठक आयोजिण्यात आली होती. त्याला अशोक गेहलोत यांच्यासमवेत सचिन पायलटही उपस्थित होते. त्याचवेळी हे सरकार तरणार अशी खूणगाठ सर्वांनी मनाशी बांधली होती. फक्त विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाचा सोपस्कार बाकी राहिला होता.काँग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याशिवायही आम्ही बहुमत सिद्ध करू शकतो असे सूचक उद्गार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याआधी काढले होते. गेहलोत व पायलट गटाने मतभेद फार न ताणल्यामुळेच राजस्थानात सत्ता कायम राहिल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलट