शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:52 IST

सरकार तरले : भाजपचा डाव हाणून पाडला -काँग्रेस

जयपूर : अतिशय नाराज झालेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी अखेर पक्षामध्येच राहाण्याचा निर्णय घेतल्याने राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार यापुढेही टिकणार हे स्पष्ट झाले होते. त्या गोष्टीवर राजस्थानच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकून अशोक गेहलोत सरकारने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.२०० सदस्यसंख्या असलेल्या राजस्थान विधानसभेत काँग्रेस पक्षाचे १०७ आमदार असून या पक्षाच्या सरकारला मित्र पक्ष व अपक्षांचा पाठिंबा आहे. तर भाजपचे ७२ आमदार आहेत. सचिन पायलट यांचे समर्थक असलेले १९ काँग्रेस आमदार पुन्हा आपल्या नेत्यासह पुन्हा पक्षाच्या छावणीत परतल्याने गेहलोत निश्चिंत झाले होते. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले होते.लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारांना अस्थिर करण्याऱ्यांना आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकून धडा शिकविला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली आहे. ते म्हणाले की, भाजपने मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश या राज्यांत खूप कारस्थाने केली. तोच प्रयोग त्यांना राजस्थानमध्ये करून माझे सरकार उलथवायचे होते. पण त्या पक्षाचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला आहे.तर सचिन पायलट यांनी सांगितले की, विरोधकांनी उभे केलेले अनेक अडथळे पार करून अशोक गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यातून सर्वांचा काँग्रेस पक्षावर व राज्य सरकारवर असलेला विश्वासही प्रकट झाला आहे. आम्ही उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न सुरू झाले आहेत असेही पायलट म्हणाले. सचिन पायलट समर्थक १९ आमदार पक्षातून फुटल्यास गेहलोत सरकारला धोका निर्माण झाला असता.मतभेद न ताणण्याचा दाखविला शहाणपणाविश्वासदर्शक ठरावावर मतदानाच्या आदल्या दिवशी गुरुवारी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची गुरुवारी बैठक आयोजिण्यात आली होती. त्याला अशोक गेहलोत यांच्यासमवेत सचिन पायलटही उपस्थित होते. त्याचवेळी हे सरकार तरणार अशी खूणगाठ सर्वांनी मनाशी बांधली होती. फक्त विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाचा सोपस्कार बाकी राहिला होता.काँग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याशिवायही आम्ही बहुमत सिद्ध करू शकतो असे सूचक उद्गार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याआधी काढले होते. गेहलोत व पायलट गटाने मतभेद फार न ताणल्यामुळेच राजस्थानात सत्ता कायम राहिल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलट