शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

"चारमीनार आमच्या अब्बांची इमारत, अब्बांच्या समोर या’’, उत्तर प्रदेशात ओवेसींचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 19:16 IST

Asaduddin Owaisi News: आज कानपूरमध्ये झालेल्या सभेत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून ओवेसींनी आपले लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये हैदराबादमधील प्रसिद्ध चारमीनार हा आपल्या अब्बांची इमारत असल्याचा दावा केला.

कानपूर - काही महिन्यांवर आलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनीही सलग रॅली आणि सभा घेऊन मुस्लिमांना आपल्या पारड्यात खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, आज कानपूरमध्ये झालेल्या सभेत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून ओवेसींनी आपले लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये हैदराबादमधील प्रसिद्ध चारमीनार हा आपल्या अब्बांची इमारत असल्याचा दावा केला. तसेच मुस्लिमांची स्थिती बँडवाल्यांसारखी आहे. ज्यांना लग्नात बाहेर उभे केले जाते, असेही ते म्हणाले. (Asaduddin Owaisi Says, "Charminar, our father's building, come in front of our father" )

ओवेसी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी हैदराबादच्या जनतेला लाख सलाम, आम्ही भाजपाला पुन्हा पराभूत केले. नरेंद्र मोदींनी स्वत: येऊन माझ्याविरोधात सभा घेतली. तुमचे मुख्यमंत्री बाबा सुद्धा प्रचारासाठी आले होते. नंतर ते राहुल गांधीही आले होते. चारमीनारजवळ जलसा केला. तेव्हा आम्ही सांगितले होते की चारमीनार आमच्या अब्बांची इमारत आहे. अब्बांच्या समोर या.

जाजमऊच्या अकील कंपाऊंडमध्ये आयोजित सभेमध्ये ओवेसींनी सांगितले की, मुस्लिम हे वरातीमधील त्या बँड पार्टीप्रमाणे झाले आहेत, ज्यांना आधी बाजा वाजवण्यास सांगितले जाते. मात्र वर लग्नस्थळी पोहोचल्यावर बँडवाल्यांना बाहेरच थांबवले जाते. आता मुसलमान बँड वाजवणार नाही. तर आम्ही लोकशाहीचा बाजा वाजवू, प्रत्येक जातीमध्ये एक नेता आहे. मात्र मुस्लिमांचा कुणी नेता नाही आहे. उत्तर प्रदेशात मुस्लिम लोकसंख्या १९ टक्के आहे. मात्र त्यांचा एकही नेता नाही. मरण्याआधी उत्तर प्रदेशात १०० मुस्लिम नेते तयार व्हावेत, अशी माझी इच्छा आहे.

ओवेसींनी सांगितले की, उत्तर प्रदेशच्या मुस्लिमांनी ठरवले पाहिजे की, २०२२ मध्ये ते केवळ मत देणारे बनणार की नेता बनणार? आपणा बँडबाजावाले बनता कामा नये. ज्या समाजाचा नेता असतो. त्या समाजाला मान दिला जातो. मात्र मुस्लिमांचा कुणीही नेता नाही आहे. मुस्लिमांना एक होऊन मत द्यावे लागेल. ओवेसींनी सांगितले की, मुस्लिम आता जागृत झाले नाहीत तर नुकसान होईल. पोलिसांनी मौलाना कलीम सिद्धिकींना तुरुंगात पाठवले. मात्र काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि समाजवाद्यांनी काहीच सांगितले नाही. त्यांचे मतदार दुरावतील याची त्यांना चिंता आहे.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण