शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
4
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
5
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
6
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
7
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
8
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
9
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
10
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
11
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
12
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
13
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
14
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
16
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
17
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
18
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
19
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
20
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...

पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 00:02 IST

India Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं वृत्त आहे. दरम्यान, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी युद्धबंदीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं वृत्त आहे. दरम्यान, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी युद्धबंदीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर भारताविरोधात दशतवाद पसरवण्यासाठी करत राहील तोपर्यंत, कायमस्वरूपी शांतता शक्य नाही, युद्धबंदी होवो वा न होवो पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई सुरूच राहिली पाहिजे. 

यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी लष्कर आणि सरकारला पाठिंबा जाहीर करताना बाह्य आक्रमणाविरोधात मी नेहमीच सरकार आणि सशस्त्र दलांना पाठिंबा देईन असे सांगितले. तसेच यावेळी युद्धबंदीवरून सरकारला काही प्रश्नही विचारले आहेत.  

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी एका परराष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धविरामाची घोषणा का केली,? सिमला करारानंतर भारत नेहमीच द्विराष्ट्रीय संबंधांमध्ये तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाला नाकारत आला आहे. आता आपण ही बाब स्वीकारली आहे का? काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयीकरण होणार नाही, कारण हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, अशी मला अपेक्षा आहे- आपण तटस्थ ठिकाणी चर्चेचा प्रस्ताव का मान्य केला? या चर्चेचा अजेंडा काय असेल, पाकिस्तान भविष्यात आपल्या भूमीवर दहशतवादाला खतपाणी घालणार नाही, याची हमी देणार का?- आपण पाकिस्तानला भविष्यात दहशतवादी हल्ले करण्यापासून रोखण्याच्या आपल्या उद्देशात यशस्वी झालो आहोत का? युद्धबंदीचा हा केवळ एकमेव उद्देश होता का? -पाकिस्तानला FATEच्या ग्रे यादीत टाकण्यासाठीची आपली आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू राहिली पाहिजे  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान