शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Asaduddin Owaisi:"काश्मीरी पंडितांचे दुसऱ्यांदा स्थलांतर अन् भाजप चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ": असदुद्दीन ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 19:34 IST

Asaduddin Owaisi: काश्मीर खोऱ्यात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यावरुन असदुद्दीन ओवेसींनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी जम्मू-काश्मीरमध्ये गैर-मुस्लिम, विशेषत: काश्मिरी पंडितांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्याऐवजी नरेंद्र मोदी सरकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचा आरोप ओवेसींनी केला.

ओवेसी यांनी गुरुवारी या मुद्द्यावर ट्विट करत लिहिले, "काश्मीर खोऱ्यातून दुसऱ्यांदा स्थलांतर सुरू आहे आणि मोदी सरकार चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त. यासाठी पंतप्रधान कार्यालय जबाबदार आहे. सरकारकडून 1989 च्या चुकांची पुनरावृत्ती होत आहे," असे ओवेसी म्हणाले.

दुसर्‍या ट्विटमध्ये, ते म्हणतात, "1987 च्या विधानसभा निवडणुकीत ज्याप्रकारे गोंधळ उडाला होता, नव्या परिसीमनातून फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने पंडितांचा वापर फक्त राजकारणासाठी केला. त्यांच्या काळातील दंगलींबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा ते म्हणतात - पंडितांचे काय? भाजपला पंडितांचा कळवळा नाही," असेही ते म्हणाले. 

काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग वाढल्याअलीकडच्या काळात काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची बँकेत घुसून हत्या केली. तो मूळचा राजस्थानमधील हनुमानगडचा रहिवासी होता. यापूर्वी 31 मे रोजी एका शिक्षिकेची शाळेत घुसून आणि 25 मे रोजी एका सरकारी कर्मचाऱ्याची ऑफीसमध्ये घुसून हत्या करण्यात आली होती. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा