शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"सरकारच चिथावणी देतंय; मुख्यमंत्री, मंत्री आहोत याचंही भान त्यांना नाहीये", असदुद्दीन ओवेसी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 16:45 IST

Nagpur Violence News: नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर बोलताना असदुद्दीन ओवेसी यांनी महायुती सरकारलाच जबाबदार धरले. सरकारचं चिथावणी देत आहे, असा दावा त्यांनी केला. 

Nagpur Latest News: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये १७ मार्च रोजी हिंसेचा भडका उडाला. यात वाहनांचे आणि मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले. नागपुरातील हिंसाचारानंतर धरपकड सुरू असून, या घटनेला मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री जबाबदार असल्याचे दावा एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची विधाने बघा. सरकारचं चिथावणी देत आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिल्लीत असदुद्दीन ओवेसी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात राज्य सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. 

चार-पाच दिवसांपूर्वीची विधाने बघा

"मागील काही आठवड्यांपासून जी विधाने महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून केली जात आहेत. ते बघण्याची गरज आहे. सगळ्यात मोठी चिथावणी तर सत्तेकडून आहे. सरकारच चिथावणीखोर विधाने करत आहे. तुम्ही मागील चार-पाच दिवसांपूर्वीची विधाने बघा."

फोटो जाळून प्रतिक्रिया न उमटल्याने तुम्हाला त्रास झाला -ओवेसी

"चिथावणी यांनीच दिली आणि त्यांना याचंही भान नाही की ते मंत्री आहेत... मुख्यमंत्री आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्यातरी बादशाहाचे फोटो महाराष्ट्रात जाळले. कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. त्यामुळे तुम्हाला त्रास झाला आणि तुम्ही काय केलं की, कुराणातील आयत आहेत, जी एका कपड्यावर लिहिली जातात. ते तुम्ही जाळले. त्यावेळी तेथील मुस्लीम आणि हिंदू लोकांनी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली. हे थांबवा. ते कापड जाळू नका, सांगितले. पण कारवाई केली गेली नाही. 

संविधानाची शपथ घेतलीये ना, चिथावणीखोर विधाने का करता?

"संध्याकाळी या गोष्टी घडल्या. मी या हिंसाचाराचा निषेध करतो. पण, तुम्ही सगळ्यांकडे व्यवस्थित बघा. जी विधाने मंत्र्यांनी दिली आहेत. आताही दिले जात आहेत. तुम्ही कायद्याचे अनुकरण करा ना. तुम्ही तर भारतीय संविधानाचा शपथ घेतली आहे. मग तुम्ही चिथावणीखोर विधाने का करत आहात?", असा सवाल ओवेसींनी केला. 

"मला कुणाची कुठली तरी गोष्ट आवडत नाही. तुम्हाला कुणाची कुठली तरी गोष्ट आवडत नाही. मग कुणीही कायदा हातात घेऊन नावडत सांगणार का? हे बघण्याची गरज आहे. हे चुकीचे घडत आहे. सरकारची चूक आहे. गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे", असा ठपका ओवेसींनी ठेवला.  

ओवेसी म्हणाले, "तुमची विचारधारा बाजूला ठेवा आणि..." 

"महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. हा जो हिंसाचार झालाय आहे, तो केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळ झाला आहे. हे खूप चुकीचे घडत आहे. तुम्ही सत्तेत आहात आणि तुमची जी विचारधारा आहे, ती बाजूला ठेवा. तुमची विचारधारा असायला हवी भारताचे संविधान आणि कायद्याचे पालन करणे. ६ डिसेंबर १९९२ ला काय घडलं? त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला अग्रीगेस अॅक्ट म्हटले. तर तुम्ही बघा. सत्ता तुमची आहे. मंत्री तुमचे आहे. कायद्याची पालन आणि अंमलबजावणी तुम्हाला करायची आहे", असे उत्तर असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

टॅग्स :nagpurनागपूरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCrime Newsगुन्हेगारी