शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"सरकारच चिथावणी देतंय; मुख्यमंत्री, मंत्री आहोत याचंही भान त्यांना नाहीये", असदुद्दीन ओवेसी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 16:45 IST

Nagpur Violence News: नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर बोलताना असदुद्दीन ओवेसी यांनी महायुती सरकारलाच जबाबदार धरले. सरकारचं चिथावणी देत आहे, असा दावा त्यांनी केला. 

Nagpur Latest News: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये १७ मार्च रोजी हिंसेचा भडका उडाला. यात वाहनांचे आणि मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले. नागपुरातील हिंसाचारानंतर धरपकड सुरू असून, या घटनेला मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री जबाबदार असल्याचे दावा एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची विधाने बघा. सरकारचं चिथावणी देत आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिल्लीत असदुद्दीन ओवेसी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात राज्य सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. 

चार-पाच दिवसांपूर्वीची विधाने बघा

"मागील काही आठवड्यांपासून जी विधाने महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून केली जात आहेत. ते बघण्याची गरज आहे. सगळ्यात मोठी चिथावणी तर सत्तेकडून आहे. सरकारच चिथावणीखोर विधाने करत आहे. तुम्ही मागील चार-पाच दिवसांपूर्वीची विधाने बघा."

फोटो जाळून प्रतिक्रिया न उमटल्याने तुम्हाला त्रास झाला -ओवेसी

"चिथावणी यांनीच दिली आणि त्यांना याचंही भान नाही की ते मंत्री आहेत... मुख्यमंत्री आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्यातरी बादशाहाचे फोटो महाराष्ट्रात जाळले. कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. त्यामुळे तुम्हाला त्रास झाला आणि तुम्ही काय केलं की, कुराणातील आयत आहेत, जी एका कपड्यावर लिहिली जातात. ते तुम्ही जाळले. त्यावेळी तेथील मुस्लीम आणि हिंदू लोकांनी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली. हे थांबवा. ते कापड जाळू नका, सांगितले. पण कारवाई केली गेली नाही. 

संविधानाची शपथ घेतलीये ना, चिथावणीखोर विधाने का करता?

"संध्याकाळी या गोष्टी घडल्या. मी या हिंसाचाराचा निषेध करतो. पण, तुम्ही सगळ्यांकडे व्यवस्थित बघा. जी विधाने मंत्र्यांनी दिली आहेत. आताही दिले जात आहेत. तुम्ही कायद्याचे अनुकरण करा ना. तुम्ही तर भारतीय संविधानाचा शपथ घेतली आहे. मग तुम्ही चिथावणीखोर विधाने का करत आहात?", असा सवाल ओवेसींनी केला. 

"मला कुणाची कुठली तरी गोष्ट आवडत नाही. तुम्हाला कुणाची कुठली तरी गोष्ट आवडत नाही. मग कुणीही कायदा हातात घेऊन नावडत सांगणार का? हे बघण्याची गरज आहे. हे चुकीचे घडत आहे. सरकारची चूक आहे. गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे", असा ठपका ओवेसींनी ठेवला.  

ओवेसी म्हणाले, "तुमची विचारधारा बाजूला ठेवा आणि..." 

"महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. हा जो हिंसाचार झालाय आहे, तो केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळ झाला आहे. हे खूप चुकीचे घडत आहे. तुम्ही सत्तेत आहात आणि तुमची जी विचारधारा आहे, ती बाजूला ठेवा. तुमची विचारधारा असायला हवी भारताचे संविधान आणि कायद्याचे पालन करणे. ६ डिसेंबर १९९२ ला काय घडलं? त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला अग्रीगेस अॅक्ट म्हटले. तर तुम्ही बघा. सत्ता तुमची आहे. मंत्री तुमचे आहे. कायद्याची पालन आणि अंमलबजावणी तुम्हाला करायची आहे", असे उत्तर असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

टॅग्स :nagpurनागपूरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCrime Newsगुन्हेगारी