शहरं
Join us  
Trending Stories
1
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
2
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
3
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
4
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; संजीव उन्हाळेंचे लोकसभा निकालावर भाकीत
5
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
6
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
7
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
8
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
9
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
10
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
11
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
12
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
13
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
14
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
15
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
16
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
19
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
20
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले

Asaduddin Owaisi on RSS: “मोहन भागवतांचे भाषण द्वेषपूर्ण, देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही”; ओवेसींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 5:35 AM

हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर असमतोल कुठून येतो, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे.

नवी दिल्ली: संपूर्ण देशात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळाला. तर राजकीय पटलावरही दसरा सकाळपासून ते रात्रीपर्यंत चांगलाच गाजला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS च्या विजयादशमी निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यानंतर बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पडला आणि रात्री शिवसेनेचे शिवाजी पार्क आणि बीकेसी येथे दसरा मेळावे अगदी दणक्यात झाले. मोहन भागवत यांच्या विधानांचा समाचार घेत एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. मोहन भागवतांचे विजयादशमीचे भाषण द्वेषपूर्ण होते. तसेच देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही, असे सांगत ओवेसी यांनी अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला.

कर्तव्यपथ आत्मनिर्भर भारत होत आहे. मात्र आपला आत्मा काय आहे याबाबत नेतृत्व, नागरिक व समाजात स्पष्टता हवी. प्रगतीचा मार्ग सरळ नसतो, त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो. लवचिकता ठेवावी लागते, असे सांगत मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणावर भाष्य केले होते. यावरून ओवेसी यांनी टीका केली आहे. 

देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही

असदुद्दीन ओवेसी यांनी एकामागून एक ट्विट करत, जर हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर असमतोल कुठून येतो. सध्या लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही. आम्ही रिप्लेसमेंट दर आधीच गाठला आहे. चिंतेची बाब म्हणजे आपली लोकसंख्या वृद्धत्वाकडे वेगाने चाललेली आहे. देशात बेरोजगारी वाढत आहे. प्रजनन दरात सर्वांत वेगाने घट मुस्लिमांमध्ये दिसून आली आहे. मोहन भागवत दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने द्वेषपूर्ण भाषणे देतात. लोकांना वाढत्या लोकसंख्येची भीती दाखवतात. या भीतीमुळे नरसंहार, द्वेषाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे, असा आरोपही ओवेसी यांनी केला. 

दरम्यान, भारताने गांभीर्याने विचारमंथन करून सर्वसमावेशक असे लोकसंख्या धोरण आणण्याची गरज आहे. लोकसंख्येमध्येही पुराव्यांचा समतोल असायला हवा. लोकसंख्येच्या असंतुलनाचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हे पन्नास वर्षांपूर्वी घडले होते. पण आजही ते घडत आहे. पूर्व तिमोर नावाचा एक नवीन देश तयार झाला, दक्षिण सुदान नावाचा देश तयार झाला. कोसोवो झाला लोकसंख्येतील फरकामुळे नवे देश निर्माण झाले. देश फुटले. जन्मदर हा त्याचा देशाचा भाग आहे, पण बळजबरी, फसवणूक आणि लालसेमुळे होणारे धर्मांतर हा त्याचा मोठा घटक आहे. आणि जिथे सीमापार घुसखोरी होते तिथे घुसखोरीमुळे लोकसंख्येचा पॅटर्नही बदलतो. हा समतोल राखणे राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत