शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

वक्फ विधेयकाला समर्थन देताच नितीश कुमारांना धक्का; विश्वास तोडला म्हणत ५ नेत्यांची JDU ला सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:05 IST

वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या मंजुरीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षात खळबळ उडाली आहे.

Waqf Bill 2025: लोकसभेनंतर राज्यसभेतही बहुमताने वक्फ दुरूस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली तर विरोधात २३२ एवढी मतं पडली. अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत हे विधेयक मांडले होते. त्यानंतर आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल आणि त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. दुसरीकडे, वक्फ दुरुस्ती विधेयकावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूने मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. मात्र आता नितीश कुमार यांना धक्का देत जेडीयुच्या पाच मुस्लीम नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या मंजुरीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षात खळबळ उडाली आहे. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये बंडखोरी सुरू झाली आहे. पक्षातून एकामागून एक मुस्लिम नेत्यांचे राजीनामे सुरूच आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्याने संतप्त झालेल्या पाच मुस्लिम नेत्यांनी पक्ष सोडला आहे.

वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्याने जेडीयूच्या अल्पसंख्याक सेलचे राज्य सचिव मोहम्मद शाहनवाज मलिक, प्रदेश सरचिटणीस सई मोहम्मद, तबरेज सिद्दीकी अलिग, भोजपूरचे पक्षाचे सदस्य मोहम्मद दिलशान रैन आणि मोहम्मद कासिम अन्सारी यांनी पक्षाशी संबंध तोडले आहेत. जेडीयूने मुस्लिम समाजाचा विश्वास तोडला असून हे पाऊल धर्मनिरपेक्ष प्रतिमेच्या विरोधात असल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे. मात्र पक्षाने हे दावे फेटाळून लावले आहेत.

जेडीयूने या राजीनाम्यांना विशेष महत्त्व दिले नाही आणि या नेत्यांचा पक्षाशी कोणताही अधिकृत संबंध नसल्याचे म्हटले आहे. जेडीयूच्या जिल्हाध्यक्ष मंजू देवी यांनी म्हटलं की, कासिम अन्सारी यांची आधीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून ते जेडीयूचे सदस्य नाहीत. याशिवाय जेडीयूच्या तिकिटावर त्यांनी कधीही निवडणूक लढवली नसल्याचेही सांगण्यात आले. दुसरीकडे, माजी आमदार मौलाना गुलाम रसूल बलियावी आणि जेडीयू आमदार गुलाम गौस यांनीही या मुद्द्यावर आपला निषेध नोंदवला आहे. या विधेयकाद्वारे वक्फ बोर्डाची जमीन हिसकावण्याचा प्रयत्न केला जात असून, त्यामुळे मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या योजनांवर परिणाम होणार आहे.

दुसरीकडे, वक्फ विधेयकाविरोधात कायदेशीर लढा देण्याची तयारीही सुरू झाली आहे. इदरा-ए-शरियाचे अध्यक्ष आणि माजी आमदार मौलाना गुलाम रसूल बलियावी यांनी देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये या विषयावर कायदेशीर सेलची बैठक होणार असून या निर्णयाला आव्हान दिले जाईल, असं म्हटलं आहे. तसेच अलीगढ येथील जमीयत उलेमा ए हिंद संघटनेचे शहर अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद अकबर कासमी यांनी सरकारला इशारा दिला आहे. हे विधेयक मुस्लिमांचा धार्मिक अधिकार हिसकावून घेणार आहे. यामुळे मुसलमान रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करतील. हे आंदोलन स्वातंत्र्याच्या वेळी मुस्लीम रस्त्यावर आले होते तसेच असेल असं कासमी यांनी म्हटलं. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डNitish Kumarनितीश कुमारJantar Mantarजंतर मंतरBiharबिहार