शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"दार उघडताच..."; TTD अध्यक्ष बीआर नायडू यांनी सांगितलं तिरुपतीत चेंगराचेंगरीदरम्यान नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 10:47 IST

तिरुपती मंदिर परिसरातील चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या भाविकांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे...

आंध्रप्रदेशातील 'तिरुपती विष्णू निवासम' या निवासी परिसरात बुधवारी (९ जानेवारी) रात्रीच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. या दुर्गटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत. वैकुंठ द्वार येथील दर्शनाचे टोकन मिळविण्यासाठी येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी हा प्रकार घडला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी संबंधित घटनेसंदर्भात माध्यमांना माहिती दिली आहे.

काय म्हणाले टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू? चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात माध्यमांसोबत बोलताना टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू म्हणाले, "ही एक दु:खद घटना आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तिरुपतीला भेट देणार आहेत. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. उत्सवादरम्यान अशी घटना घडणे दुर्दैवी आहे. वैकुंठ एकादशी दर्शनाच्या व्यवस्थेबाबत मुख्यमंत्री गंभीर आहेत आणि त्यांनी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे."

चेंगराचेंगरीच्या कारणासंदर्भात बोलताना नायडू म्हणाले, "रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर, संबंधित महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी दारवाजा उघडण्यात आला. दरवाजा उघडताच चेंगराचेंगरी झाली."

PM मोदींनी व्यक्त केलं दु:ख - तिरुपती मंदिर परिसरातील चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या भाविकांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर त्यांनी म्हटले आहे, "आंध्र प्रदेशातील तिरुपतिमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीमुळे दुःखी आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले, माझ्या सहवेदना त्यांच्यासोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो"

जखमी रुग्णालयात दाखल -या दुर्घटनेनंतर, ४० जखमींपैकी २८ जणांना रुईया रुग्णालयात, तर १२ जणांना सीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने ४ भाविकांचा रुईयामध्ये आणि २ भाविकांचा सिम्समध्ये मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ महिला आणि १ पुरूषाचा समावेश आहे.

वैकुंठ एकादशीचा कार्यक्रम - मिळालेल्या माहितीनुसार, १०-१९ जानेवारीदरम्यान वैकुंठ दर्शन सुरू होणार आहे. या कालावधीत लाखो भाविक दर्शनासाठी तिरुपती मंदिरात येतील. यासाठी तिरुपती मंदिर ट्रस्टने संपूर्ण तयारीही केली आहे. टीटीडीने गुरुवारपासून तिरुपतीमधील ९ केंद्रांमध्ये ९४ काउंटर्सवर वैकुंठ द्वार येथील दर्शनाचे टोकन देण्याची व्यवस्था केली आहे. 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीDeathमृत्यू