शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

Mamata Banerjee : "मी जिवंत असेपर्यंत कोणाचीही नोकरी जाणार नाही, मला जेलमध्ये..."; ममता बॅनर्जी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 14:30 IST

Mamata Banerjee : शिक्षक भरतीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली.

पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील २५,७५३ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. शिक्षक भरतीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली.

"मी जिवंत असेपर्यंत कोणताही शिक्षक आपली नोकरी गमावणार नाही" असं  ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तसेच कोणत्याही किंमतीत शिक्षकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी वचनबद्ध आहेत असंही सांगितलं. "सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने माझं मन खूप दुःखी आहे. मला माहीत आहे की जर मी यावर बोलले तर मला जेलमध्येही जावं लागू शकतं, पण तरीही मी बोलेन. जर कोणी मला आव्हान दिलं तर त्याला कसं उत्तर द्यायचं हे मला माहित आहे" असं ममता यांनी म्हटलं आहे. 

"कोण पात्र आहे आणि कोण नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करावं. आम्हाला एक यादी द्या. शिक्षण व्यवस्था नष्ट करण्याचा अधिकार कोणालाही नाही" असंही सांगितलं. ममता यांनी एक उदाहरण दिलं आणि म्हणाल्या की, NEET परीक्षेतही अनेक आरोप झाले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले नाही. बंगालला का लक्ष्य केलं जात आहे? लोक बंगालच्या प्रतिभेला घाबरतात का? असा सवालही विचारला. 

ममता बॅनर्जी यांचे हे विधान राज्यातील शिक्षकांसाठी एक मोठा संदेश आहे. शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्या पूर्णपणे तयार आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत पात्र शिक्षकांच्या हक्कांचे रक्षण करतील असं सांगत त्यांनी राज्यातील शिक्षकांच्या हक्कांसाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे आणि त्यांचा संघर्ष केवळ एका राज्यासाठी नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या संरक्षणासाठी आहे हे स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालSupreme Courtसर्वोच्च न्यायालयTeacherशिक्षकPoliticsराजकारण