शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

अरविंद केजरीवाल यांचे संघाला पत्र; म्हणाले, नेते खुलेआम पैसे वाटताहेत; भाजपकडूनही टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 07:44 IST

केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे, भाजपने भागवत यांना पत्र लिहू नका. त्यांच्यापासून काही तरी शिका, असा सल्लावजा टोमणा केजरीवाल यांना लावला आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय पारा वाढला आहे.

चंद्रशेखर बर्वे

नवी दिल्ली : अख्खा उत्तर भारत थंडीमुळे गारठला असला तरी अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना लिहिलेल्या पत्राने देशाच्या राजधानीचा राजकीय पारा वाढविण्याचे काम केले आहे.

केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे, भाजपने भागवत यांना पत्र लिहू नका. त्यांच्यापासून काही तरी शिका, असा सल्लावजा टोमणा केजरीवाल यांना लावला आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय पारा वाढला आहे.

केजरीवाल यांचे प्रश्न- भाजपने भूतकाळात जे काही चुकीचे केले आहे, त्यास संघाचा पाठिंबा आहे काय? - भाजपचे नेते खुलेआम पैसे वाटत आहेत. संघाचा पाठिंबा आहे काय? - मतदारांची नावे यादीतून गाळली जात आहेत. हे योग्य आहे का? - भाजप लोकशाही कमजोर करीत आहे, असे संघाला वाटत नाही काय?

संघापासून सेवेची भावना शिका : भाजपकेजरीवाल यांनी संघ प्रमुखांना पत्र लिहिण्याऐवजी संघाकडून देशसेवेची भावना शिकण्याचा सल्ला भाजपने दिला आहे.  भागवत यांना पत्र लिहिण्यामागे केजरीवाल यांचा पब्लिसिटी स्टंट आहे. 

‘सेवा भारती’ ही झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मागासवर्गीय लोकांच्या कल्याणासाठी काम करते. यामुळे केजरीवाल यांनी देशसेवा कशी करावी, हे संघाकडून शिकायला पाहिजे, अशा शब्दात राज्यसभेचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केजरीवालांवर हल्ला चढविला आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघdelhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपा