शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

अरविंद केजरीवाल यांचे संघाला पत्र; म्हणाले, नेते खुलेआम पैसे वाटताहेत; भाजपकडूनही टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 07:44 IST

केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे, भाजपने भागवत यांना पत्र लिहू नका. त्यांच्यापासून काही तरी शिका, असा सल्लावजा टोमणा केजरीवाल यांना लावला आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय पारा वाढला आहे.

चंद्रशेखर बर्वे

नवी दिल्ली : अख्खा उत्तर भारत थंडीमुळे गारठला असला तरी अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना लिहिलेल्या पत्राने देशाच्या राजधानीचा राजकीय पारा वाढविण्याचे काम केले आहे.

केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे, भाजपने भागवत यांना पत्र लिहू नका. त्यांच्यापासून काही तरी शिका, असा सल्लावजा टोमणा केजरीवाल यांना लावला आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय पारा वाढला आहे.

केजरीवाल यांचे प्रश्न- भाजपने भूतकाळात जे काही चुकीचे केले आहे, त्यास संघाचा पाठिंबा आहे काय? - भाजपचे नेते खुलेआम पैसे वाटत आहेत. संघाचा पाठिंबा आहे काय? - मतदारांची नावे यादीतून गाळली जात आहेत. हे योग्य आहे का? - भाजप लोकशाही कमजोर करीत आहे, असे संघाला वाटत नाही काय?

संघापासून सेवेची भावना शिका : भाजपकेजरीवाल यांनी संघ प्रमुखांना पत्र लिहिण्याऐवजी संघाकडून देशसेवेची भावना शिकण्याचा सल्ला भाजपने दिला आहे.  भागवत यांना पत्र लिहिण्यामागे केजरीवाल यांचा पब्लिसिटी स्टंट आहे. 

‘सेवा भारती’ ही झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मागासवर्गीय लोकांच्या कल्याणासाठी काम करते. यामुळे केजरीवाल यांनी देशसेवा कशी करावी, हे संघाकडून शिकायला पाहिजे, अशा शब्दात राज्यसभेचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केजरीवालांवर हल्ला चढविला आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघdelhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपा