शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात न लढण्याचा अरविंद केजरीवाल यांचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 20:32 IST

लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून डावपेच आखण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्दे2014 च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना वाराणसी येथे आव्हान दिले होतेपण आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात न लढण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी  घेतला आहेअरविंद केजरीवाल हे सध्या केवळ दिल्लीवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत

लखनौ - लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून डावपेच आखण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना वाराणसी येथे आव्हान दिले होते. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात न लढण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी  घेतला आहे. आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी ही माहिती दिली. मात्र आप वाराणसी येथून मोदींविरोधात तगडा उमेदवार देणार आहे, असेही सिंह यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल यांच्या या निर्णयाबाबत माहिती देताना संजय सिंह यांनी सांगितले की, ''अरविंद केजरीवाल हे सध्या केवळ दिल्लीवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत.''  मात्र आप वाराणसी येथून मोदींविरोधात तगडा उमेदवार देणार आहे, असेही संजय सिंह यांनी सांगितले.  2013 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षीत यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव केला होता. त्यानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले होते. मात्र तिथे त्यांचा पराभव झाला होता. पण त्या निवडणुकीत केजरीवाल दुसऱ्या स्थानावर राहिले होते.  दरम्यान, आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत मोजक्या ठिकाणीच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आप दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदिगड येथील लोकसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील काही जागांवरही आम आदमी पक्ष आपले उमेदवार देणार आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण