शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

"देशातील जनतेने सांगावं की, तुम्हाला देशाचा आदर करणारा पंतप्रधान हवा आहे की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:15 IST

'मणिपूरमध्ये 4 हजार घरे जाळली, 60 हजार लोक बेघर झाले, 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, पण पंतप्रधान गप्प राहिले.'

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत आयोजित विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपच्या आमदारांना मणिपूरची चिंता नाही, म्हणूनच त्यांनी विधानसभेतून काढतापाय घेतला. मणिपूरच्या लोकांना काय वाटत असेल. मणिपूरच्या घटनेवर पंतप्रधान मौन बाळगून आहेत. पंतप्रधान मोदींनी किमान शांततेचे आवाहन करायला हवे होते, पण ते तेवढंही करत नाहीत, अशी टीका केजरीवालांनी केली.

केजरीवाल पुढे म्हणतात, मणिपूरमध्ये 4 हजार घरे जाळली गेली, 60 हजार लोक बेघर झाले, 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, साडेतीनशे धार्मिक स्थळे जाळली, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांमध्ये गोळीबार झाला, जगभर भारताची थू-थू झाली, पण भारताचे पंतप्रधान गप्प राहिले. महिलांवर अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाला, तरीदेखील पंतप्रधान गप्प होते. मणिपूरचे मुख्यमंत्री सांगतात की, तिथे रोजच अशा घटना घडत आहेत, तरीदेकील पंतप्रधान शांत बसतात.

भाजपचे लोक जवाहरलाल नेहरूंना शिव्या देतात, पण निदान जवाहरलाल नेहरू चीनच्या डोळ्यात डोळे घालून लढले होते. मला देशातील जनतेला विचारायचे आहे की, तुम्हाला देशाचा आदर करणारा पंतप्रधान हवा आहे की व्यवसाय करणारा पंतप्रधान हवा आहे. हात धरुन मंदिरात नेल्याने डिप्लोमसी होत नाही, त्यासाठी डोळे दाखवावे लागतात. आज चीन आव्हान देत आहे, पण पंतप्रधान गप्प आहेत. 2020 मध्ये चीनने गलवानमध्ये भारतीय जमीन ताब्यात घेतली, पण पंतप्रधान गप्प आहेत, अशीही टीका त्यांनी यावेळी केली. 

विधानसभेत अदानीचा मुद्दा उपस्थित करत केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधानांनी किमान हिंडेनबर्ग अहवालाबाबत ट्विट करायला हवे होते. अदानी मुद्द्यावर मोदी गप्प आहेत. जनतेचा पैसा बुडाला, पण पंतप्रधान गप्प राहिले. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांना देशातून देशातून पळवून लावण्यात आले. आरबीआयच्या माहितीनुसार, 16000 डिफॉल्टर आहेत, त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय कारवाई का करत नाहीत? लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांवर जीप चालवली, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प राहिले. हाथरसमध्ये दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, पण पंतप्रधान गप्प राहिले. हे दुबळे, अहंकारी आणि भ्रष्ट पंतप्रधान आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीManipur Violenceमणिपूर हिंसाचारdelhiदिल्लीBJPभाजपाAAPआप