शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

"देशातील जनतेने सांगावं की, तुम्हाला देशाचा आदर करणारा पंतप्रधान हवा आहे की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:15 IST

'मणिपूरमध्ये 4 हजार घरे जाळली, 60 हजार लोक बेघर झाले, 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, पण पंतप्रधान गप्प राहिले.'

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत आयोजित विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपच्या आमदारांना मणिपूरची चिंता नाही, म्हणूनच त्यांनी विधानसभेतून काढतापाय घेतला. मणिपूरच्या लोकांना काय वाटत असेल. मणिपूरच्या घटनेवर पंतप्रधान मौन बाळगून आहेत. पंतप्रधान मोदींनी किमान शांततेचे आवाहन करायला हवे होते, पण ते तेवढंही करत नाहीत, अशी टीका केजरीवालांनी केली.

केजरीवाल पुढे म्हणतात, मणिपूरमध्ये 4 हजार घरे जाळली गेली, 60 हजार लोक बेघर झाले, 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, साडेतीनशे धार्मिक स्थळे जाळली, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांमध्ये गोळीबार झाला, जगभर भारताची थू-थू झाली, पण भारताचे पंतप्रधान गप्प राहिले. महिलांवर अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाला, तरीदेखील पंतप्रधान गप्प होते. मणिपूरचे मुख्यमंत्री सांगतात की, तिथे रोजच अशा घटना घडत आहेत, तरीदेकील पंतप्रधान शांत बसतात.

भाजपचे लोक जवाहरलाल नेहरूंना शिव्या देतात, पण निदान जवाहरलाल नेहरू चीनच्या डोळ्यात डोळे घालून लढले होते. मला देशातील जनतेला विचारायचे आहे की, तुम्हाला देशाचा आदर करणारा पंतप्रधान हवा आहे की व्यवसाय करणारा पंतप्रधान हवा आहे. हात धरुन मंदिरात नेल्याने डिप्लोमसी होत नाही, त्यासाठी डोळे दाखवावे लागतात. आज चीन आव्हान देत आहे, पण पंतप्रधान गप्प आहेत. 2020 मध्ये चीनने गलवानमध्ये भारतीय जमीन ताब्यात घेतली, पण पंतप्रधान गप्प आहेत, अशीही टीका त्यांनी यावेळी केली. 

विधानसभेत अदानीचा मुद्दा उपस्थित करत केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधानांनी किमान हिंडेनबर्ग अहवालाबाबत ट्विट करायला हवे होते. अदानी मुद्द्यावर मोदी गप्प आहेत. जनतेचा पैसा बुडाला, पण पंतप्रधान गप्प राहिले. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांना देशातून देशातून पळवून लावण्यात आले. आरबीआयच्या माहितीनुसार, 16000 डिफॉल्टर आहेत, त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय कारवाई का करत नाहीत? लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांवर जीप चालवली, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प राहिले. हाथरसमध्ये दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, पण पंतप्रधान गप्प राहिले. हे दुबळे, अहंकारी आणि भ्रष्ट पंतप्रधान आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीManipur Violenceमणिपूर हिंसाचारdelhiदिल्लीBJPभाजपाAAPआप