शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

"देशातील जनतेने सांगावं की, तुम्हाला देशाचा आदर करणारा पंतप्रधान हवा आहे की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:15 IST

'मणिपूरमध्ये 4 हजार घरे जाळली, 60 हजार लोक बेघर झाले, 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, पण पंतप्रधान गप्प राहिले.'

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत आयोजित विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपच्या आमदारांना मणिपूरची चिंता नाही, म्हणूनच त्यांनी विधानसभेतून काढतापाय घेतला. मणिपूरच्या लोकांना काय वाटत असेल. मणिपूरच्या घटनेवर पंतप्रधान मौन बाळगून आहेत. पंतप्रधान मोदींनी किमान शांततेचे आवाहन करायला हवे होते, पण ते तेवढंही करत नाहीत, अशी टीका केजरीवालांनी केली.

केजरीवाल पुढे म्हणतात, मणिपूरमध्ये 4 हजार घरे जाळली गेली, 60 हजार लोक बेघर झाले, 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, साडेतीनशे धार्मिक स्थळे जाळली, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांमध्ये गोळीबार झाला, जगभर भारताची थू-थू झाली, पण भारताचे पंतप्रधान गप्प राहिले. महिलांवर अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाला, तरीदेखील पंतप्रधान गप्प होते. मणिपूरचे मुख्यमंत्री सांगतात की, तिथे रोजच अशा घटना घडत आहेत, तरीदेकील पंतप्रधान शांत बसतात.

भाजपचे लोक जवाहरलाल नेहरूंना शिव्या देतात, पण निदान जवाहरलाल नेहरू चीनच्या डोळ्यात डोळे घालून लढले होते. मला देशातील जनतेला विचारायचे आहे की, तुम्हाला देशाचा आदर करणारा पंतप्रधान हवा आहे की व्यवसाय करणारा पंतप्रधान हवा आहे. हात धरुन मंदिरात नेल्याने डिप्लोमसी होत नाही, त्यासाठी डोळे दाखवावे लागतात. आज चीन आव्हान देत आहे, पण पंतप्रधान गप्प आहेत. 2020 मध्ये चीनने गलवानमध्ये भारतीय जमीन ताब्यात घेतली, पण पंतप्रधान गप्प आहेत, अशीही टीका त्यांनी यावेळी केली. 

विधानसभेत अदानीचा मुद्दा उपस्थित करत केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधानांनी किमान हिंडेनबर्ग अहवालाबाबत ट्विट करायला हवे होते. अदानी मुद्द्यावर मोदी गप्प आहेत. जनतेचा पैसा बुडाला, पण पंतप्रधान गप्प राहिले. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांना देशातून देशातून पळवून लावण्यात आले. आरबीआयच्या माहितीनुसार, 16000 डिफॉल्टर आहेत, त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय कारवाई का करत नाहीत? लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांवर जीप चालवली, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प राहिले. हाथरसमध्ये दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, पण पंतप्रधान गप्प राहिले. हे दुबळे, अहंकारी आणि भ्रष्ट पंतप्रधान आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीManipur Violenceमणिपूर हिंसाचारdelhiदिल्लीBJPभाजपाAAPआप