शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर होणार नाहीत हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 10:08 AM

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत. केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करण्याची ही पाचवी वेळ आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत. केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करण्याची ही पाचवी वेळ आहे. आम आदमी पार्टीने या संदर्भात एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, ईडीचे समन्स बेकायदेशीर आहे. तसेच ईडीच्या समन्सवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

"केजरीवाल यांना अटक करून ते दिल्लीतील सरकार पाडू इच्छित आहेत. आम्ही हे कधीच होऊ देणार नाही" असं आम आदमी पार्टीने म्हटलं आहे. यापूर्वी, ईडीने 17 जानेवारी, 3 जानेवारी, 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना समन्स पाठवले होते, परंतु ते हजर झाले नाहीत. 

ईडीने सातत्याने समन्स जारी केल्यानंतर आम आदमी पार्टीने दावा केला होता की, ही सर्व प्रक्रिया अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी केली जात आहे. ईडी त्याला चौकशीच्या बहाण्याने बोलावून अटक करू इच्छित आहे. जर ईडीला चौकशी करायची असेल तर ते आपले प्रश्न लिहून केजरीवाल यांना देऊ शकतात असं आपने म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना समन्स का पाठवले आहेत? असा सवाल उपस्थित केला. "दोन वर्षांपासून तपास सुरू आहे, तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच का बोलावले जात आहे? सीबीआयने 8 महिन्यांपूर्वी फोन केला होता. मी पण जाऊन उत्तरे दिली होती." 

"आता लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना बोलावले जात असल्याने माझी चौकशी करणे हा त्यांचा उद्देश नाही. ते लोक मला फोन करून अटक करू इच्छितात. जेणेकरून मी प्रचार करू शकत नाही. आज भाजपा नेत्यांना पक्षात समाविष्ट करण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर करत आहे" असं केजरीवालांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNarendra Modiनरेंद्र मोदी