शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

'मला मुख्यमंत्रिपदाचा लोभ नाही, राजीनामा...' CM अरविंद केजरीवांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 19:18 IST

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार की, तुरुंगातून सरकार चालवणार? पाहा काय म्हणाले...

Delhi News: आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी शुक्रवारी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'आमची संघटना आणि कार्यकर्ते, हीच आम आदमी पार्टीची सर्वात मोठी ताकद आहे. केंद्र सरकार मला तुरुंगात टाकण्याची योजना आखत आहे,' असा मोठा दावाही त्यांनी यावेळी केला.

'तुरुंगाची भीती वाटत नाही'केजरीवाल पुढे म्हणतात, 'आम्ही तुरुंगात जाण्यास घाबरत नाही. मी 15 दिवस तुरुंगात राहून आलोय, तिथे चांगली व्यवस्था असते, त्यामुळे तुम्हीही(उपस्थित कार्यकर्ते) तुरुंगात जाण्याची भीती बाळगू नका. सरदार भगतसिंग इतके दिवस तुरुंगात राहिले, मनीष सिसोदिया 9 महिन्यांपासून तुरुंगात आहेत, सत्येंद्र जैन एका वर्षापासून तुरुंगात आहेत, त्यामुळे आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही,' असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.

'आम्हाला सत्तेचा लोभ नाही''आम्हाला सत्तेची लालूच नाही, मी 49 दिवसांत राजीनामा दिला होता. मला वाटते की मी जगातील पहिला मुख्यमंत्री आहे, ज्याने 49 दिवसांत स्वतःच्या इच्छेने राजीनामा दिला होता. मी माझा राजीनामा बुटाच्या टोकावर घेऊन फिरतो. मला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा लोभ नाही. राजीनामा द्यायचा की तुरुंगातून सरकार चालवायचे, याबाबत मी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करत आहे. माझ्या सर्व आमदार आणि नगरसेवकांशीही चर्चा केली होती, आता आज माझ्या कार्यकर्त्यांशी बोललो.' 

'जनतेच्या इच्छेशिवाय काहीही करणार नाही''मी तुमच्यावर जबाबदारी टाकत आहे. दिल्लीच्या जनतेने आम्हाला खूप प्रेम दिले आहे. दिल्लीच्या जनतेच्या इच्छेशिवाय आम्ही काहीही करणार नाही. दिल्लीत घरोघरी जाऊन जनतेला विचारणार आहोत की, आम्ही काय करावे? आम्ही अवघड परिस्थितीत आहोत. येत्या 10-15 दिवसात आम्हाला दिल्लीतील प्रत्येक घरात जाऊन जनतेला विचारणार की, आम्ही राजीनामा द्यावा किंवा तुरुंगातून सरकार चालवावे? जनता जे म्हणेल, ते आम्ही ते करू,' असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार