शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

'मला मुख्यमंत्रिपदाचा लोभ नाही, राजीनामा...' CM अरविंद केजरीवांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 19:18 IST

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार की, तुरुंगातून सरकार चालवणार? पाहा काय म्हणाले...

Delhi News: आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी शुक्रवारी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'आमची संघटना आणि कार्यकर्ते, हीच आम आदमी पार्टीची सर्वात मोठी ताकद आहे. केंद्र सरकार मला तुरुंगात टाकण्याची योजना आखत आहे,' असा मोठा दावाही त्यांनी यावेळी केला.

'तुरुंगाची भीती वाटत नाही'केजरीवाल पुढे म्हणतात, 'आम्ही तुरुंगात जाण्यास घाबरत नाही. मी 15 दिवस तुरुंगात राहून आलोय, तिथे चांगली व्यवस्था असते, त्यामुळे तुम्हीही(उपस्थित कार्यकर्ते) तुरुंगात जाण्याची भीती बाळगू नका. सरदार भगतसिंग इतके दिवस तुरुंगात राहिले, मनीष सिसोदिया 9 महिन्यांपासून तुरुंगात आहेत, सत्येंद्र जैन एका वर्षापासून तुरुंगात आहेत, त्यामुळे आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही,' असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.

'आम्हाला सत्तेचा लोभ नाही''आम्हाला सत्तेची लालूच नाही, मी 49 दिवसांत राजीनामा दिला होता. मला वाटते की मी जगातील पहिला मुख्यमंत्री आहे, ज्याने 49 दिवसांत स्वतःच्या इच्छेने राजीनामा दिला होता. मी माझा राजीनामा बुटाच्या टोकावर घेऊन फिरतो. मला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा लोभ नाही. राजीनामा द्यायचा की तुरुंगातून सरकार चालवायचे, याबाबत मी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करत आहे. माझ्या सर्व आमदार आणि नगरसेवकांशीही चर्चा केली होती, आता आज माझ्या कार्यकर्त्यांशी बोललो.' 

'जनतेच्या इच्छेशिवाय काहीही करणार नाही''मी तुमच्यावर जबाबदारी टाकत आहे. दिल्लीच्या जनतेने आम्हाला खूप प्रेम दिले आहे. दिल्लीच्या जनतेच्या इच्छेशिवाय आम्ही काहीही करणार नाही. दिल्लीत घरोघरी जाऊन जनतेला विचारणार आहोत की, आम्ही काय करावे? आम्ही अवघड परिस्थितीत आहोत. येत्या 10-15 दिवसात आम्हाला दिल्लीतील प्रत्येक घरात जाऊन जनतेला विचारणार की, आम्ही राजीनामा द्यावा किंवा तुरुंगातून सरकार चालवावे? जनता जे म्हणेल, ते आम्ही ते करू,' असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार