शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

"ते सुप्रीम कोर्टाला उन्हाळी सुट्टी लागायची वाट बघत होते"; केजरीवालांचा मोदी सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 18:17 IST

भाजपानेही दिले जोरदार प्रत्युत्तर, दिलं नवं आव्हान

Arvind Kejriwal vs BJP: दिल्लीचे केजरीवाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेचे अधिकार दिल्ली सरकारच्या हातात गेले होते, मात्र आता मोदी सरकारने त्याविरोधात अध्यादेश आणला आहे. केंद्र सरकारच्या या अध्यादेशावर केजरीवाल यांनी शाब्दिक वार केला आहे. केंद्र सरकारला माहिती आहे की त्यांचा अध्यादेश बेकायदेशीर आहे, तो कोर्टात टिकणार नाही, त्यामुळे ते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी सर्वोच्च न्यायालय बंद होण्याची वाट पाहत असल्याचा खोचक टोला केजरीवाल यांनी लगावला. 'हा अध्यादेश बेकायदेशीर आहे हे माहीत असल्याने त्यांनी वाट पाहिली. कोर्टात हा अध्यादेश १० मिनिटेही टिकणार नाही हे त्यांना माहीत आहे. 1 जुलैला सुप्रीम कोर्ट सुरू होईल तेव्हा आम्ही त्या अध्यादेशाला आव्हान देऊ,' असे केजरीवाल म्हणाले.

मुख्यमंत्री केजरीवाल यांचा आरोप

केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालय बंद होण्याची वाट पाहत असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. केजरीवाल पुढे म्हणाले की, हा लोकशाहीशी झालेला वाईट पद्धतीचा विनोद आहे. पाऊण महिन्यानंतर कोर्ट सुरू होईल आणि आम्हालाही माहिती आहे की या अध्यादेशाचे काय होणार हे. लोकांनाही आता याची कल्पना आहेच. हा अध्यादेश केवळ सव्वा महिन्यासाठी आणला आहे का? असा सवाल त्यांनी केला.

केंद्र सरकारचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रश्नांना उत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. गौरव भाटिया पुढे म्हणाले की, केजरीवाल जी कट्टर फसवणूक करणारे आहेत, कारण ज्या संविधानाने तुम्ही (अरविंद केजरीवाल) मुख्यमंत्री झालात, त्याचप्रमाणे दिल्लीचे एलजी बनवले आहे. कोर्टाला सुट्टी आहे म्हणून हा अध्यादेश आणला आहे आणि तो घटनाबाह्य असल्याची खात्री आहे, असे वाटत असेल तर त्यांनी लगेच सोमवारीच कोर्टाच्या सुटीत भरणाऱ्या विशेष खंडपीठात अपील करावे, म्हणजे 'दूध का दूध पानी का पानी' होऊने जाईल.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय