शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"ते सुप्रीम कोर्टाला उन्हाळी सुट्टी लागायची वाट बघत होते"; केजरीवालांचा मोदी सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 18:17 IST

भाजपानेही दिले जोरदार प्रत्युत्तर, दिलं नवं आव्हान

Arvind Kejriwal vs BJP: दिल्लीचे केजरीवाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेचे अधिकार दिल्ली सरकारच्या हातात गेले होते, मात्र आता मोदी सरकारने त्याविरोधात अध्यादेश आणला आहे. केंद्र सरकारच्या या अध्यादेशावर केजरीवाल यांनी शाब्दिक वार केला आहे. केंद्र सरकारला माहिती आहे की त्यांचा अध्यादेश बेकायदेशीर आहे, तो कोर्टात टिकणार नाही, त्यामुळे ते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी सर्वोच्च न्यायालय बंद होण्याची वाट पाहत असल्याचा खोचक टोला केजरीवाल यांनी लगावला. 'हा अध्यादेश बेकायदेशीर आहे हे माहीत असल्याने त्यांनी वाट पाहिली. कोर्टात हा अध्यादेश १० मिनिटेही टिकणार नाही हे त्यांना माहीत आहे. 1 जुलैला सुप्रीम कोर्ट सुरू होईल तेव्हा आम्ही त्या अध्यादेशाला आव्हान देऊ,' असे केजरीवाल म्हणाले.

मुख्यमंत्री केजरीवाल यांचा आरोप

केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालय बंद होण्याची वाट पाहत असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. केजरीवाल पुढे म्हणाले की, हा लोकशाहीशी झालेला वाईट पद्धतीचा विनोद आहे. पाऊण महिन्यानंतर कोर्ट सुरू होईल आणि आम्हालाही माहिती आहे की या अध्यादेशाचे काय होणार हे. लोकांनाही आता याची कल्पना आहेच. हा अध्यादेश केवळ सव्वा महिन्यासाठी आणला आहे का? असा सवाल त्यांनी केला.

केंद्र सरकारचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रश्नांना उत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. गौरव भाटिया पुढे म्हणाले की, केजरीवाल जी कट्टर फसवणूक करणारे आहेत, कारण ज्या संविधानाने तुम्ही (अरविंद केजरीवाल) मुख्यमंत्री झालात, त्याचप्रमाणे दिल्लीचे एलजी बनवले आहे. कोर्टाला सुट्टी आहे म्हणून हा अध्यादेश आणला आहे आणि तो घटनाबाह्य असल्याची खात्री आहे, असे वाटत असेल तर त्यांनी लगेच सोमवारीच कोर्टाच्या सुटीत भरणाऱ्या विशेष खंडपीठात अपील करावे, म्हणजे 'दूध का दूध पानी का पानी' होऊने जाईल.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय