शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 20:28 IST

Arvind Kejriwal Lok sabha Election : 'भाजपला रशिया आणि उत्तर कोरियाप्रमाणे भारतात हुकूमशाही आणायची आहे.'

Arvind Kejriwal Lok sabha Election : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील मोती नगरमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांनी आपल्या अटकेविषयी भाष्य करताना जनतेला मतदानाचे आवाहन केले. तसेच, 'मला तुरुंगात का पाठवले, माझा काय दोष? मी दिल्लीसाठी काम केले, कदाचित त्यामुळेच भाजपने मला तुरुंगात पाठवले असेल,' अशी टीकाही केली.

नवी दिल्लीतील उमेदवार सोमनाथ भारती यांच्या प्रचारार्थ ते आले असता केजरीवाल म्हणतात, 'तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. तुमच्या प्रेमामुळे आणि देवाच्या कृपेमुळेच मी आज तुमच्यामध्ये उभा आहे. आता हे लोक म्हणत आहेत की, 20 दिवसांनी मला पुन्हा तुरुंगात जावे लागेल. मला तुरुंगात जायची वेळ येऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल, तर 25 मे रोजी झाडूचे बटन दाबा', असे आवाहनदेखील केजरीवालांनी यावेळी केले. 

'दिल्लीतील लोकांना मोफत वीज, पाणी आणि आरोग्य सुविधा दिल्या, हा माझा गुन्हा आहे. मी महिलांना मोफत बस प्रवास दिला, मी 500 शाळा बांधल्या, या गुन्ह्यासाठी भाजपने मला तुरुंगात टाकले. तुम्ही केंद्रात आहात, तुम्हाला तर 5 हजार शाळा बांधायच्या होत्या, पण त्याऐवजी तुम्ही मला तुरुंगात टाकायचे काम केले. भाजपकडून दिल्लीतील जनतेला ज्या सुविधा दिल्या जातात, त्या कुठेच दिसत नाहीत', अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

केजरीवाल पुढे म्हणाले, 'भाजपवाले म्हणतात 400 जागा द्या. हे लोक 400 जागा घेऊन काय करणार? त्यांचा उद्देश देशातून आरक्षण, संविधान आणि निवडणुका संपवण्या आहे. या लोकांना रशिया आणि उत्तर कोरियाप्रमाणे भारतात हुकूमशाही आणायची आहे. लोकांना नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदाराचे नावदेखील माहित नाही, त्या कोणाच्या फोनलाही उत्तर देत नाही,' असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा