शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

प्रदूषणानंतर दिल्लीत पाण्यावरून राजकारण, केजरीवालांनी दिले केंद्राच्या अहवालाला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 14:21 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशुद्ध पाण्याच्या मुद्द्यावरून पासवान यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशुद्ध पाण्याच्या मुद्द्यावरून पासवान यांच्यावर निशाणा साधला आहे.पाण्यावरून राजकारण केलं जात असल्याचं म्हणत  केजरीवालांनी दिले केंद्राच्या अहवालाला आव्हान दिलं आहे.प्रदूषणानंतर दिल्लीत पाण्यावरून राजकारण सुरू झाले आहे.

नवी दिल्ली - दिल्लीची हवाच नव्हे, तर पाणीही अशुद्ध असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी दिली होती. भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) 20 राज्यांच्या राजधान्यांच्या केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी हे सांगितले होते. मात्र आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशुद्ध पाण्याच्या मुद्द्यावरून पासवान यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच पाण्यावरून राजकारण केलं जात असल्याचं म्हणत  केजरीवालांनी दिले केंद्राच्या अहवालाला आव्हान दिलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी 'पाण्यावरून राजकारण होत आहे. 11 ठिकाणच्या नमुन्यांच्या आधारे कोणत्याही शहरातील पाण्याला खराब ठरवलं जाऊ शकत नाही. पाण्याचे नमुने कोणत्या ठिकाणचे आहेत हे सांगितलं जात नाही. रिपोर्टमध्ये 2 टक्के पाण्याचे नमुने हे फेल झाले आहेत. दिल्लीमध्ये 1500 ते 2000 पाण्याचे नमुने घेण्यात येतील. दिल्लीतील पाणी शुद्ध आहे की अशुद्ध हे पाहण्यासाठी रामविलास पासवान यांनी यावं आणि तपास करावा असं आव्हान देतो' असं म्हटलं आहे. 

दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. दिल्ली सरकारने 4 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हा वाहतूक नियम लागू केला आहे. या नियमाच्या कालावधीत वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले होते. तसेच गरज भासल्यास आणखी काही दिवस सम-विषम नियम लागू करण्यात येणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली होती. मात्र आता प्रदूषण कमी झाल्याने याची गरज नसल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतील पाणी खराब असल्याचे दिसून आले होते. त्यावेळी रामविलास पासवान यांनी आम्ही कोणत्याही सरकारला दोष  देत नाही. या विषयावरून आम्ही राजकारण करत नाही. तर आमचे उद्दिष्ट लोकांपर्यंत स्वच्छ पाणी पोहोचले पाहिजे. त्यामुळे दिल्ली सरकारने समजून घेतले पाहिजे. देशातील शहरांमध्ये पाणी गुणवत्ता चाचणी यापुढे सुद्धा केली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची तीन टप्प्यांत चाचणी करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सर्व राजधानींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात सर्व जिल्ह्यांतील पाण्याची चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. 

टॅग्स :delhi pollutionदिल्ली प्रदूषणArvind Kejriwalअरविंद केजरीवालWaterपाणीpollutionप्रदूषणdelhiदिल्ली