शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

CAA वरून घरासमोर आंदोलन करणाऱ्यांवर केजरीवाल संतापले, म्हणाले, ‘’या पाकिस्तान्यांची एवढी हिंमत…’’  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 14:15 IST

Arvind Kejriwal : हा कायदा लागू झाल्यानंतर १९४७ पेक्षा मोठं स्थलांतर होईल. पाकिस्तानमधील लोक भारतात येतील. हे कितपत सुरक्षित असेल. चोरी, बलात्कार, दरोडे आणि दंगे वाढतील. जर तुमच्या घराजवळ पाकिस्तान, बांगलादेशमधून आलेले लोक झोपड्या बांधून राहू लागले तर तुम्हाला आवडेल का? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला

देशामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. केजरीवाल यांनी सीएएला विरोध केल्याने पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या हिंदू आश्रितांनी काल अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर केजरीवाल या आश्रितांवर संतप्त झाले आहेत.

केजरीवाल यांनी एक्सवर प्रतिक्रिया देताना या आंदोलकांबाबत लिहिलं की, या पाकिस्तान्यांची एवढी हिंमत? आधी यांनी आमच्या देशात बेकायदेशीरपणे घुसखोरी केली. आमच्या देशाचा कायदा मोडला. यांची रवानगी तुरुंगात झाली पाहिजे होती. आता यांची एवढी हिंमत झाली आहे की हे आमच्या देशामध्ये आंदोलन करत आहेत. गोंधळ घातल आहेत. सीएए लागू झाल्यानंतर संपूर्ण देशभरात पाकिस्तानी आणि बांगलादेशी पसरतील आणि लोकांना त्रस्त करतील. भाजपा यांना आपली व्होटबँक बनवण्याच्या स्वार्थापायी संपूर्ण देशाला अडचणीत लोटत आहेत, अशी घणाघाती टीका केजरीवाल यांनी केली.

केंद्र सरकारने सीएए लागू केल्यानंतर केजरीवाल यांनी या कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हा कायदा लागू झाल्यानंतर १९४७ पेक्षा मोठं स्थलांतर होईल. पाकिस्तानमधील लोक भारतात येतील. हे कितपत सुरक्षित असेल. चोरी, बलात्कार, दरोडे आणि दंगे वाढतील. जर तुमच्या घराजवळ पाकिस्तान, बांगलादेशमधून आलेले लोक झोपड्या बांधून राहू लागले तर तुम्हाला आवडेल का? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला.

दरम्यान, सीएएच्या मुद्द्यावरून वारंवार प्रश्न उपस्थित करत असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, भ्रष्टाचार उघड झाल्याने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा तोल ढळला आहे. हे सर्व लोक भारतात आलेले आहेत, भारतातच राहत आहे. केवळ त्यांना अधिकार मिळालेला नाही. तो अधिकार त्यांना द्यायचा आहे, हे अरविंद केजरीवाल यांना माहिती नसावं, असा टोला अमित शाह यांनी लगावला.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकCentral Governmentकेंद्र सरकारHinduहिंदूIndiaभारतPakistanपाकिस्तान