शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

CAA वरून घरासमोर आंदोलन करणाऱ्यांवर केजरीवाल संतापले, म्हणाले, ‘’या पाकिस्तान्यांची एवढी हिंमत…’’  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 14:15 IST

Arvind Kejriwal : हा कायदा लागू झाल्यानंतर १९४७ पेक्षा मोठं स्थलांतर होईल. पाकिस्तानमधील लोक भारतात येतील. हे कितपत सुरक्षित असेल. चोरी, बलात्कार, दरोडे आणि दंगे वाढतील. जर तुमच्या घराजवळ पाकिस्तान, बांगलादेशमधून आलेले लोक झोपड्या बांधून राहू लागले तर तुम्हाला आवडेल का? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला

देशामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. केजरीवाल यांनी सीएएला विरोध केल्याने पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या हिंदू आश्रितांनी काल अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर केजरीवाल या आश्रितांवर संतप्त झाले आहेत.

केजरीवाल यांनी एक्सवर प्रतिक्रिया देताना या आंदोलकांबाबत लिहिलं की, या पाकिस्तान्यांची एवढी हिंमत? आधी यांनी आमच्या देशात बेकायदेशीरपणे घुसखोरी केली. आमच्या देशाचा कायदा मोडला. यांची रवानगी तुरुंगात झाली पाहिजे होती. आता यांची एवढी हिंमत झाली आहे की हे आमच्या देशामध्ये आंदोलन करत आहेत. गोंधळ घातल आहेत. सीएए लागू झाल्यानंतर संपूर्ण देशभरात पाकिस्तानी आणि बांगलादेशी पसरतील आणि लोकांना त्रस्त करतील. भाजपा यांना आपली व्होटबँक बनवण्याच्या स्वार्थापायी संपूर्ण देशाला अडचणीत लोटत आहेत, अशी घणाघाती टीका केजरीवाल यांनी केली.

केंद्र सरकारने सीएए लागू केल्यानंतर केजरीवाल यांनी या कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हा कायदा लागू झाल्यानंतर १९४७ पेक्षा मोठं स्थलांतर होईल. पाकिस्तानमधील लोक भारतात येतील. हे कितपत सुरक्षित असेल. चोरी, बलात्कार, दरोडे आणि दंगे वाढतील. जर तुमच्या घराजवळ पाकिस्तान, बांगलादेशमधून आलेले लोक झोपड्या बांधून राहू लागले तर तुम्हाला आवडेल का? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला.

दरम्यान, सीएएच्या मुद्द्यावरून वारंवार प्रश्न उपस्थित करत असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, भ्रष्टाचार उघड झाल्याने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा तोल ढळला आहे. हे सर्व लोक भारतात आलेले आहेत, भारतातच राहत आहे. केवळ त्यांना अधिकार मिळालेला नाही. तो अधिकार त्यांना द्यायचा आहे, हे अरविंद केजरीवाल यांना माहिती नसावं, असा टोला अमित शाह यांनी लगावला.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकCentral Governmentकेंद्र सरकारHinduहिंदूIndiaभारतPakistanपाकिस्तान