शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

500 रुपयांत येतात अन्...; केजरीवालांच्या वक्तव्यावरून राजकीय राडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 1:12 PM

केजरीवालांचे काळीज का फाटतय?

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये बाहेरील राज्यातील लोक येऊन पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करून घेण्याचा फायदा घेत आहेत, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. यावरून भाजपा आणि जेडीयूने अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी इतर राज्यातून (खासकरून बिहार) दिल्लीत येणाऱ्या लोकांवर निशाणा साधला. यावरुन विरोध पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दिल्लीतील भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी बिहारहून लोक येत असल्यामुळे अरविंद केजरीवाल यांचे काळीज का फाटत आहे, असा सवाल केला आहे. तर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पार्टी जेडीयूने सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?अरविंद केजरीवाल यांनी काल एका कार्यक्रमात आरोग्य व्यवस्थेचा उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले," उपचार करण्यासाठी दिल्लीत बाहेरून जास्त लोक येत आहेत. बिहारमधून एक व्यक्ती 500 रुपयांचे तिकीट घेऊन दिल्लीत येतो आणि 5 लाख रुपयांचे ऑपरेशन मोफत करून घेतो."

केजरीवालांचे काळीज का फाटतंय?दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, "पुन्हा एकदा त्यांनी (केजरीवाल) द्वेष दाखविला आहे. जर बिहारचा व्यक्ती दिल्लीत उपचार करतो, तर अरविंद केजरीवाल यांचे काळीज का फाटते? 5 लाखांपर्यंत मोफत उपचार योजना अरविंद केजरीवाल यांनी आणली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही योजना आणली आहे, ज्याला आपण आयुष्मान भारता बोलतो."  

बाळासाहेब ठाकरेंसारखे केजरीवालांनी बोलू नये - जेडीयूजेडीयूचे वरिष्ठ नेता केसी त्यागी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. अरविंद केजरीवाल बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांमुळेच निवडणूक जिंकले होते. ते एख सन्मानीय नेते आहेत. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे बोलू नये, असे केसी त्यागी यांनी म्हटले आहे. तसेच, ते म्हणाले, "राष्ट्रीय राजधानी फक्त आम आदमी पार्टीची नाही आहे. याठिकाणी देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून लोक उपचारासाठी येतात."  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाBiharबिहार