शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

"मोदींना माहीत आहे की फक्त अरविंद केजरीवाल हेच त्यांना...": आतिशी यांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 17:11 IST

अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेवरून आम आदमी पक्ष भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. आज पुन्हा एकदा दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी सिंह यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेवरून आम आदमी पक्ष भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. आज पुन्हा एकदा दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी सिंह यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. त्य़ा म्हणाल्या की, भाजपाला फक्त अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच आव्हान देऊ शकते, त्यामुळेच केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

आतिशी सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, "लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक का करण्यात आली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहित आहे की, त्यांना फक्त अरविंद केजरीवालच आव्हान देऊ शकतात."

आम आदमी पक्षाच्या कोणत्याही नेत्याकडे पैसे मिळाले नसल्याचा दावाही आतिशी सिंह यांनी केला. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच केजरीवाल यांना का अटक करण्यात आली, असा सवाल विचारला. पंतप्रधान मोदींना माहित आहे की, उद्या जर कोणी नेता आपला पराभव करणार असेल तर ते अरविंद केजरीवाल आहेत आणि याच भीतीमुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

आतिशी सिंह पुढे म्हणाल्या की, " अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही पुराव्याशिवाय ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीच्या मागे लपून भाजपा आपली राजकीय लढाई लढत आहे. ईडी हा राजकीय पक्ष आहे का?" अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकारण तापलं आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AAPआप