शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

'निवडणूक लढण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही', 'आप'ला सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 09:30 IST

निवडणूक लढण्यासाठी आम आदमी पार्टीकडे पैसे नसल्यामुळे दिल्लीकरांनीच आम्हाला सहकार्य करावं असं भावनिक आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

नवी दिल्ली - निवडणूक लढण्यासाठी आम आदमी पार्टीकडे पैसे नसल्यामुळे दिल्लीकरांनीच आम्हाला सहकार्य करावं असं भावनिक आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. विशेष म्हणजे 2015 मध्ये निवडणूक लढवतानाही केजरीवाल हीच भूमिका घेऊन पुढे गेले होते. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी हे आवाहन केल्याचं बोललं जात आहे. 

दिल्लीतील अनधिकृत वस्त्यांमधील नागरिकांना त्यांच्या मालकीहक्काचे पट्टे मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असं सांगताच नागरिकांनी मालकी हक्काचा कागद हाती आल्याशिवाय कुणावरही विश्वास ठेवू नये असेही केजरीवाल म्हणाले. 'गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही दिल्लीसाठी खूप काम केले आहे. पाच वर्षाच्या कार्यकाळात 1 रुपया मी स्वत: कमावला नाही आणि आता निवडणूक लढवण्यासाठी देखील आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे आता तुम्हालाच माझ्यासाठी निवडणूक लढायची आहे' असे आवाहनही केजरीवाल यांनी जाहीर सभेत केले आहे. 

दिल्लीतील अनधिकृत वस्त्यांमधील नागरिक 16 डिसेंबरपासून आपल्या मालकी हक्कासाठी अर्ज सादर करू शकणार आहेत अशी घोषणा करून केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर 180 दिवसाच्या आत प्रमाणपत्र देण्यात येईल असा दावाही केला. मात्र केंद्र सरकारकडून रजिस्ट्री प्राप्त होत नाही तोपर्यंत विश्वास ठेवू नका असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. तसेच मालकी हक्क प्राप्त करून देण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे असा विश्वासही नागरिकांना दिला आहे. 

दिल्लीमध्ये सध्या प्रदूषणावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत अशातच सुप्रीम कोर्टात याबाबत महत्वपूर्ण सुनावणी घेण्यात आली आहे. यावेळी प्रदूषणावर सुप्रीम कोर्टाने संतप्त भूमिका मांडली. लोकांना गॅसवर राहायला भाग का पाडले जात आहे? एकाच जागी सर्वांना ठार मारणे चांगले आहे, एकाच वेळी 15 बॅग्स स्फोटके घेऊन उडवून द्या, लोकांनी हे सर्व का सहन करावं? दिल्लीत आरोप-प्रत्यारोप घडत आहेत याचा त्रास होतोय अशा शब्दात सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी महाधिवक्ता तुषार मेहतांना सुनावले. 

तसेच न्यायमूर्ती अरुण मिश्रा म्हणाले की, बाहेरचे लोक आपल्या देशावर हसत आहेत कारण आपण पेंढा जाळण्यावरही नियंत्रण ठेवू शकत नाही. दोषारोपाच खेळ करुन दिल्लीच्या लोकांची सेवा होणार नाही. प्रदूषणाला गांभीर्याने न घेता आपण लोक दोषारोप खेळण्याचा प्रयत्न करताय असं सांगितले. जनतेसाठी पिण्याचे पाणी सुरक्षित आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी सुमोटोला सांगण्यात आलं आहे. याचा अहवाल केंद्र आणि दिल्ली सरकारला सर्व संबंधित माहितीसह कोर्टात सादर करावा असं सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयAAPआपElectionनिवडणूक