शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

'निवडणूक लढण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही', 'आप'ला सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 09:30 IST

निवडणूक लढण्यासाठी आम आदमी पार्टीकडे पैसे नसल्यामुळे दिल्लीकरांनीच आम्हाला सहकार्य करावं असं भावनिक आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

नवी दिल्ली - निवडणूक लढण्यासाठी आम आदमी पार्टीकडे पैसे नसल्यामुळे दिल्लीकरांनीच आम्हाला सहकार्य करावं असं भावनिक आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. विशेष म्हणजे 2015 मध्ये निवडणूक लढवतानाही केजरीवाल हीच भूमिका घेऊन पुढे गेले होते. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी हे आवाहन केल्याचं बोललं जात आहे. 

दिल्लीतील अनधिकृत वस्त्यांमधील नागरिकांना त्यांच्या मालकीहक्काचे पट्टे मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असं सांगताच नागरिकांनी मालकी हक्काचा कागद हाती आल्याशिवाय कुणावरही विश्वास ठेवू नये असेही केजरीवाल म्हणाले. 'गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही दिल्लीसाठी खूप काम केले आहे. पाच वर्षाच्या कार्यकाळात 1 रुपया मी स्वत: कमावला नाही आणि आता निवडणूक लढवण्यासाठी देखील आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे आता तुम्हालाच माझ्यासाठी निवडणूक लढायची आहे' असे आवाहनही केजरीवाल यांनी जाहीर सभेत केले आहे. 

दिल्लीतील अनधिकृत वस्त्यांमधील नागरिक 16 डिसेंबरपासून आपल्या मालकी हक्कासाठी अर्ज सादर करू शकणार आहेत अशी घोषणा करून केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर 180 दिवसाच्या आत प्रमाणपत्र देण्यात येईल असा दावाही केला. मात्र केंद्र सरकारकडून रजिस्ट्री प्राप्त होत नाही तोपर्यंत विश्वास ठेवू नका असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. तसेच मालकी हक्क प्राप्त करून देण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे असा विश्वासही नागरिकांना दिला आहे. 

दिल्लीमध्ये सध्या प्रदूषणावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत अशातच सुप्रीम कोर्टात याबाबत महत्वपूर्ण सुनावणी घेण्यात आली आहे. यावेळी प्रदूषणावर सुप्रीम कोर्टाने संतप्त भूमिका मांडली. लोकांना गॅसवर राहायला भाग का पाडले जात आहे? एकाच जागी सर्वांना ठार मारणे चांगले आहे, एकाच वेळी 15 बॅग्स स्फोटके घेऊन उडवून द्या, लोकांनी हे सर्व का सहन करावं? दिल्लीत आरोप-प्रत्यारोप घडत आहेत याचा त्रास होतोय अशा शब्दात सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी महाधिवक्ता तुषार मेहतांना सुनावले. 

तसेच न्यायमूर्ती अरुण मिश्रा म्हणाले की, बाहेरचे लोक आपल्या देशावर हसत आहेत कारण आपण पेंढा जाळण्यावरही नियंत्रण ठेवू शकत नाही. दोषारोपाच खेळ करुन दिल्लीच्या लोकांची सेवा होणार नाही. प्रदूषणाला गांभीर्याने न घेता आपण लोक दोषारोप खेळण्याचा प्रयत्न करताय असं सांगितले. जनतेसाठी पिण्याचे पाणी सुरक्षित आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी सुमोटोला सांगण्यात आलं आहे. याचा अहवाल केंद्र आणि दिल्ली सरकारला सर्व संबंधित माहितीसह कोर्टात सादर करावा असं सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयAAPआपElectionनिवडणूक