अरविंद इनामदार मुलाखत जोड
By Admin | Updated: September 11, 2015 21:24 IST2015-09-11T21:24:57+5:302015-09-11T21:24:57+5:30
प्रश्न : बाहेरुन आलेल्या पथकाने जिल्ात हस्तक्षेप करून कारवाई करण योग्य आहे का?

अरविंद इनामदार मुलाखत जोड
प रश्न : बाहेरुन आलेल्या पथकाने जिल्ात हस्तक्षेप करून कारवाई करण योग्य आहे का?इनामदार : याला हस्तक्षेप म्हणता येणार नाही. तो वरिष्ठांचा अधिकार आहे. स्थानिक अधिकार्यांनी या गोष्टी समजून घ्याव्यात. आपल्या कामात त्यांनी कमी पडता कामा नये. मी स्वत: महानिरीक्षकांना सोबत घेऊन अचानक भेटी अथवा कारवाई केल्या आहेत. नंदुरबारमध्ये पोलीस अधीक्षक विरुध्द कर्मचारी हा सामना रंगणे चुकीचे आहे. महानिरीक्षकांची ती प्राथमिक जबाबदारी आहे. पोलीस खाते हे आर्मीनंतर दुसरे शिस्तीचे खाते आहे.इन्फो.....कायद्याचा दरारा संपलाअरविंद इनामदार म्हणाले, सध्या देशात कायद्याचा दरारा संपल्याची जाणीव होत आहे. तो संपता कामा नये आणि जर कायद्याचा दरारा राहीला नाही तर सर्व काही संपेल असा सूचक इशारा इनामदार यांनी दिला. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांना काम करणे अवघड झाले आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्यासेवेबाबत खूप तफावत आहे. आयपीएस अधिकार्यांना पाच वेळा पदोन्नती मिळते तर पोलिसाला फक्त दोन वेळा. महासंचालक पदावर असताना मी स्वत: पोलिसांचा पगार तीन वेळा वाढविला तर मोठ्या घरांचाही प्रश्न मार्गी लावला होता. इन्फो.....मारिया यांच्या बदलीची गरज नव्हती शिना बोरा हत्या प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची बदली करण्याची गरजच नव्हती, चांगली प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती असे स्पष्ट मत इनामदार यांनी व्यक्त केले.या हत्याकांडात मारिया यांनी जास्त रस घेतला व कोणाला अडचणी निर्माण होतील असे कोणाला वाटत होते तर त्यांच्याकडून तपास काढून सीआयडी व अन्य यंत्रणेकडे सोपविता आला असता. पंधरा दिवसात त्यांना पदोन्नती मिळणारच होती. या पंधरा दिवसात त्यांना हटवून सरकारला काय मिळणार होते असा सवाल करुन सरकारच्या या निर्णयाविरुध्द इनामदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारच्या अशा पध्दतीमुळे पोलिसांचे मनोधैर्य खचते असेही ते म्हणाले. मारिया यांची ही प्रशासकीय बदली आहे, असे सरकारकडून सांगितले जात असले तरी या कारणाचे आपण अजिबात समर्थन करणार नाही. ही प्रशासकीय बाब होऊच शकत नाही.