शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

...तर तुम्हाला बँक, मोबाईल कंपन्यांना 'आधार' द्यावंच लागणार; जेटलींचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 16:54 IST

आधारबद्दलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला सरकार वळसा घालण्याच्या तयारीत

नवी दिल्ली: संसदेनं कायदा केल्यास नागरिकांना दूरसंचार आणि बँकिंग सेवेसाठी आधार लिंक करावं लागेल, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. मात्र संसद असा कायदा करणार की नाही, यावर जेटलींनी भाष्य करणं टाळलं. सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वीच आधारच्या वैधतेबद्दल महत्त्वपूर्ण निकाल दिला. मात्र न्यायालयानं दूरसंचार कंपन्यांसह खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या आधार सक्तीवर ताशेरे ओढले होते. यासाठी आधार कार्ड गरजेचं नाही, असं न्यायालयानं निकालात म्हटलं होतं. आधारच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्याचं अरुण जेटली एका कार्यक्रमात यांनी सांगितलं. 'आधार कार्डच्या मागील उद्देश वैध असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. सरकारकडून नागरिकांना अनुदान आणि आर्थिक सहाय्य मोठ्या प्रमाणात लोकांना दिलं जातं. खासगी कंपन्यादेखील आधारचा वापर करु शकतात. मात्र यासाठी कायदा तयार करावा लागेल,' असं जेटली यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी कलम 57 चा संदर्भ दिला. खासगी कंपन्यादेखील आधारचा वापर करु शकतात. मात्र त्यासाठी कायद्यातील योग्य कलमांचा वापर करायला हवा, असं अरुण जेटली यांनी म्हटलं. मात्र यासाठी सरकार संसदेत कायदा संमत करणार का, यावर भाष्य करणं त्यांनी टाळलं. 'आयकर भरण्यासह अनेक क्षेत्रात सर्वोच्च न्यायालयानं आधारच्या वापराला मंजुरी दिली आहे. जर दूरसंचार कंपन्यांची डेटाच्या आधारावर आधार लिंकिंग अत्यावश्यक असल्याचं सिद्ध केल्यास हे शक्य होऊ शकतं. आधार लिंकच्या दृष्टीनं दूरसंचार आणि बँकिंग ही दोन महत्त्वपूर्ण क्षेत्रं आहेत,' असं जेटली यांनी म्हटलं.  

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीAdhar Cardआधार कार्डbankबँकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय