शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

...तर तुम्हाला बँक, मोबाईल कंपन्यांना 'आधार' द्यावंच लागणार; जेटलींचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 16:54 IST

आधारबद्दलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला सरकार वळसा घालण्याच्या तयारीत

नवी दिल्ली: संसदेनं कायदा केल्यास नागरिकांना दूरसंचार आणि बँकिंग सेवेसाठी आधार लिंक करावं लागेल, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. मात्र संसद असा कायदा करणार की नाही, यावर जेटलींनी भाष्य करणं टाळलं. सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वीच आधारच्या वैधतेबद्दल महत्त्वपूर्ण निकाल दिला. मात्र न्यायालयानं दूरसंचार कंपन्यांसह खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या आधार सक्तीवर ताशेरे ओढले होते. यासाठी आधार कार्ड गरजेचं नाही, असं न्यायालयानं निकालात म्हटलं होतं. आधारच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्याचं अरुण जेटली एका कार्यक्रमात यांनी सांगितलं. 'आधार कार्डच्या मागील उद्देश वैध असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. सरकारकडून नागरिकांना अनुदान आणि आर्थिक सहाय्य मोठ्या प्रमाणात लोकांना दिलं जातं. खासगी कंपन्यादेखील आधारचा वापर करु शकतात. मात्र यासाठी कायदा तयार करावा लागेल,' असं जेटली यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी कलम 57 चा संदर्भ दिला. खासगी कंपन्यादेखील आधारचा वापर करु शकतात. मात्र त्यासाठी कायद्यातील योग्य कलमांचा वापर करायला हवा, असं अरुण जेटली यांनी म्हटलं. मात्र यासाठी सरकार संसदेत कायदा संमत करणार का, यावर भाष्य करणं त्यांनी टाळलं. 'आयकर भरण्यासह अनेक क्षेत्रात सर्वोच्च न्यायालयानं आधारच्या वापराला मंजुरी दिली आहे. जर दूरसंचार कंपन्यांची डेटाच्या आधारावर आधार लिंकिंग अत्यावश्यक असल्याचं सिद्ध केल्यास हे शक्य होऊ शकतं. आधार लिंकच्या दृष्टीनं दूरसंचार आणि बँकिंग ही दोन महत्त्वपूर्ण क्षेत्रं आहेत,' असं जेटली यांनी म्हटलं.  

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीAdhar Cardआधार कार्डbankबँकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय