शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

अर्णब गोस्वामींना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका, विधानसभा सचिवांना बजावली नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 16:38 IST

अर्णब गोस्वामी यांना धमकी देणाऱ्या एका पत्रासंदर्भात सर्वोच्च न्यायलयाने ही अवमानना नोटीस बजावली आहे. (Arnab goswami, Supreme Court, Uddhav Thackeray)

ठळक मुद्देअर्णब गोस्वामी यांना धमकी देणाऱ्या एका पत्रासंदर्भात सर्वोच्च न्यायलयाने ही अवमानना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात न्यायालयाने विधानसभा सचिवांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.

नवी दिल्ली/मुंबई - राज्यातील ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा जोरदार झटका बसला आहे. महाराष्ट्र विधानसभेत दाखल करण्यात आलेल्या विशेषाधिकार हनन प्रकरणात, रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेस  सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एवढेच नाही, तर या प्रकरणात न्यायालयाने विधानसभा सचिवांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.

अर्णब गोस्वामी यांना धमकी देणाऱ्या एका पत्रासंदर्भात सर्वोच्च न्यायलयाने ही अवमानना नोटीस बजावली आहे. यावेळी, विधानसभा अध्यक्ष आणि विशेषाधिकार समितीद्वारे पाठवण्यात आलेली नोटीस ही गोपनीय असल्याचे कारण देत, हे पत्र न्यायालयात सादर करू नये, यासाठी पत्र कसे लिहिले गेले? अशा पद्धतीने, कुणालाही कशी भीती दाखवली जाऊ शकते?' असे प्रश्नही न्यायालयाने केले आहेत. एढेच नाही, तर याप्रकरणी विधानसभा सचिवांविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस का देण्यात येऊ नये?', असा प्रश्नही न्यायालयाने नोटिशीमध्ये केला आहे. देशात कोणतीही व्यवस्था कुणालाही न्यायालयापर्यंत जाण्यापासून रोखू शकत नाही. अर्णब यांना अशा पद्धतीचे पत्र लिहून त्यांना न्याय प्रशासनाकडे जाऊ न देणे, हे न्यायात हस्तक्षे केल्यासारखेच आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

CM उद्धव ठाकरे यांच्या अवमाननेप्रकरणी अर्णब यांच्या विरोधात हक्कभंग सूचना -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवमाननेप्रकरणी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत पत्रकार अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंग सूचना मांडण्यात आली होती. याशिवाय, अर्णव गोस्वामींना विधिमंडळाने दिलेली नोटीस गोपनीय असतानाही त्यांनी ते पत्र न्यायालयासमोर सादर केले. हा प्रकारदेखील हक्कभंगाचाच आहे, असे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते.

अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक -सध्या, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगडपोलिसांनी अटक केली आहे. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात, 'अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच आपल्या पतीने आत्महत्या केली. अन्यथा ते आज जिवंत असते, असा गंभीर आरोप अन्वय यांच्या पत्नीने केला आहे.' 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयarnab goswamiअर्णब गोस्वामीState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे